अर्जुनवर आडनावाचे ओझे होण्याइतपत दबाव नको

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या देशात सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणतात. या क्रिकेटच्या देवाचा मुलगा म्हणेज अर्जुन तेंडुलकर हाही क्रिकेट खेळतो. मात्र, त्याची आणि सचिनची सतत बरोबरी केली जाते व ती अन्यायकारक आहे, असे क्रिकेटचे चाहते आणि तज्ज्ञ म्हणतात. याच प्रकरणावर आता माजी विश्वचषक विजेते आणि भारतीय कर्णधार कपिल देव यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.


कपिल देव म्हणाले की, ‘अर्जुनला नेहमी त्याच्या आडनावामुळे अतिरिक्त दबावाला सामोरे जावे लागत आहे. तो सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे म्हणून सर्वचजण त्याच्याबद्दल का बोलत आहेत? त्याला स्वतःच्या शैलीत आणि स्वत:च्या मनाप्रमाणे क्रिकेट खेळू द्या. सचिनशी त्याची तुलना करू नका. त्याला तेंडुलकर नावाचे तोटे आहेत, याची जाणीव होऊ देऊ नका. डॉन ब्रॅडमन यांच्या मुलाच्याबाबतीत हेच झाले. दबाव सहन न करू शकल्यामुळे त्याचे आडनावच काढून टाकले होते. अर्जुनवर तशी वेळ येऊ देवू नका’.


कपिल देव यांना वाटते की, अर्जुनवर अपेक्षांचे दडपण आणू नका. त्याने थोडाफार जरी त्याच्या वडिलांसारखा खेळ केला तरी त्याच्यासाठी ते खूप झाले. ‘तू फक्त तुझ्या खेळाचा आनंद घे. तुला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. तू ५० टक्के जरी तुझ्या वडिलांसारखे खेळू शकला तर यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही,’ असा सल्ला कपिल देव यांनी अर्जुनला दिला आहे.


इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामामध्ये अर्जुनला पदार्पणाची संधी मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. पण, त्याला एकाही सामन्यात खेळवण्यात आले नाही. या गोष्टीची सोशल मीडियासह क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा रंगली. मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड यांनी अर्जुनला या मोसमात एकही सामना न खेळवल्याबद्दल आपले विचार मांडले. त्यांच्या मते, २२ वर्षीय अर्जुनला आणखी बऱ्याच सरावाची गरज आहे.


मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळायला न मिळाल्याने सचिन आणि अर्जुनचे अनेक चाहते निराश झाले आहेत. मुंबईने ३०लाख रुपये खर्च करून अर्जुनला लिलावामध्ये खरेदी केले होते. मुंबईने एकाही सामन्यात त्याला खेळवले नाही. त्याऐवजी इतर अनेक नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली. अनेकदा भारतीय क्रिकेट संघात नेट गोलंदाज म्हणून अर्जुनचा वापर केला जातो. त्याने विराट कोहली, रोहित शर्मा, अगदी एमएस धोनी आणि इतर दिग्गज फलंदाजांनाही गोलंदाजी केलेली आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी