डोंबिवलीत नालेसफाई झालीच नाही

डोंबिवली (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत ३१ मेपर्यंत ८० टक्के नाले साफ करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात ५० टक्के नाफेसफाई झाली नसल्याचे चित्र दिसत आहे. डोंबिवलीकरांनी याबाबत पालिका प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. पालिका आयुक्तांनी डोंबिवलीतील नाल्यांची पाहणी करून सत्य परिस्थिती पाहावी अशी मागणी काही डोंबिबलीकर करीत आहेत.


डोंबिवलीतील अनेक मोठ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, कागद आणि कचरा साठल्याचे दिसून येत आहे. मोठे नाले पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर साफ करण्याचे निर्देश दिले असतानाही त्याउलट नालेसफाई झालीच नसल्याची पोलखोल नागरिकांनी केली आहे. हवामान खात्याने यावर्षी १०३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जिह्यात ६० टक्के पाऊस पडला तरी पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचे सिद्ध झाले असून त्यासाठी नालेसफाई न होणे हेच कारण असल्याचे मनीषा राणे यांनी सांगितले.


पालिका हद्दीतील मोठे नाले कर्मचारी वर्गाकडून तर छोटे नाले ठेकेदार पद्धतीने साफ केले जातात. त्यात साडेतीन कोटी पालिका तिजोरीतून खर्च होत आहेत. मात्र करदात्यांचा पैसा वाया जात असून नालेसफाई होत नसेल तर प्रशासनाला हा पैसा नाल्यात कुठे वाहत गेला याचे उत्तर द्यावे लागेल असे राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

‘आपला दवाखान्या’चा वापर अन्य ‘उद्योगां’साठी

पगार थकला; आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी ठाणे  : ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला 'आपला दवाखाना' हा

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन

कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास ४५ मिनिटांत होणार!

मुंबई : मुंबईसह सर्व उपनगरात मेट्रोचे जाळे पसरले आहे. काही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे तर काही मेट्रो प्रकल्प

Mira Road News : मुंबईजवळच्या मीरा रोडमध्ये पुन्हा हिंसाचार! 'पार्किंग'च्या किरकोळ वादातून ३० वाहनांची तोडफोड; परिसरात तणाव

मीरा रोड : मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड (Mira Road) परिसरात पुन्हा एकदा एका किरकोळ वादावरून परिस्थिती चिघळल्याची

काशिमीरा परिसरात मोठा राडा, २५ रिक्षांचे नुकसान, मुलींची छेडछाड; मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली बांगलादेशींच्या सहभागाची शंका

ठाणे : राज्यभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडजवळील