डोंबिवलीत नालेसफाई झालीच नाही

डोंबिवली (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत ३१ मेपर्यंत ८० टक्के नाले साफ करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात ५० टक्के नाफेसफाई झाली नसल्याचे चित्र दिसत आहे. डोंबिवलीकरांनी याबाबत पालिका प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. पालिका आयुक्तांनी डोंबिवलीतील नाल्यांची पाहणी करून सत्य परिस्थिती पाहावी अशी मागणी काही डोंबिबलीकर करीत आहेत.


डोंबिवलीतील अनेक मोठ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, कागद आणि कचरा साठल्याचे दिसून येत आहे. मोठे नाले पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर साफ करण्याचे निर्देश दिले असतानाही त्याउलट नालेसफाई झालीच नसल्याची पोलखोल नागरिकांनी केली आहे. हवामान खात्याने यावर्षी १०३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जिह्यात ६० टक्के पाऊस पडला तरी पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचे सिद्ध झाले असून त्यासाठी नालेसफाई न होणे हेच कारण असल्याचे मनीषा राणे यांनी सांगितले.


पालिका हद्दीतील मोठे नाले कर्मचारी वर्गाकडून तर छोटे नाले ठेकेदार पद्धतीने साफ केले जातात. त्यात साडेतीन कोटी पालिका तिजोरीतून खर्च होत आहेत. मात्र करदात्यांचा पैसा वाया जात असून नालेसफाई होत नसेल तर प्रशासनाला हा पैसा नाल्यात कुठे वाहत गेला याचे उत्तर द्यावे लागेल असे राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डिसेंबर २०२५ मध्ये होणार सुरू

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

बदलापूरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपले

बदलापूर : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सोमवारी पश्चिम

उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून मुलाचा मृत्यू

डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २८ तारखेला रात्री आठ

एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती

मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन

डोंबिवलीत प्रियकराने केली आत्महत्या, पण नेमकं कारण काय? खरंच प्रेयसीसोबत वाद झाला होता का?

प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं? डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या