राज्यात कोरोना केसेस हाताबाहेर जाण्याची भीती

मुंबई : गेल्या साधारण आठवड्याभरापासून रुग्णसंख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. राज्यात कोरोना केसेस हाताबाहेर जाण्याची भीती आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आणि शक्य तिथे मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.


मुंबईत माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "राज्यातल्या कोरोनाच्या केसेस सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सध्या काळजीचे वातावरण आहे. आम्ही सगळ्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. पण एकदा का कोरोना रुग्णांची संख्या वाढली की ती कशी पटकन हाताबाहेर जाते, हे आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लाटेदरम्यान बघितले आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे.


याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, "आम्ही इंधन दरामध्ये शक्य तेवढी कपात केलेली आहे. पण अजून २०१९ पासून जीएसटी परताव्याची रक्कम येणे बाकी आहे. तरी केंद्र सरकारने इंधन दरात कपात केल्यानंतर आम्हीही दरकपात केली. साडेतीन हजार कोटी रुपये जे राज्याच्या तिजोरीत येणार होते, त्याचा वापर लोकांच्या फायद्यासाठी केला आहे. त्यापेक्षा मोठा निर्णय़ सीएनजी, गॅसच्या दर कपातीबद्दल घेतला आहे."


अजित पवार पुढे म्हणाले, "आता परवा काही महंत चर्चेला बसले. एकमेकांवर माईकचा बूम उगारला. त्याचे काल भुजबळांनी प्रात्यक्षिक दाखवले. या सगळ्यातून आपण काय मिळवणार आहोत याचा विचार सर्वांनी करावा."

Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली