नौका लागल्या मुरुड समुद्रकिनारी

मुरुड (वार्ताहर) : १ जूनपासून सरकारने मासेमारी करण्यासाठी बंदी घातली आहे. त्यामुळे मुरुड बंदरामध्ये मच्छीमार बांधवांनी आपापल्या नौका शाकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुरुड समुद्रकिनारा कोळी बांधवांनी गजबजून गेला आहे. तालुक्यातील असंख्य नौका आता तब्बल दोन महिन्यांची विश्रांती घेणार आहेत.


जून-जुलै हा महिना माशांचा प्रजननाचा आणि अंडी देण्याचा कालावधी असल्याकारणाने या दोन महिन्यात माशांच्या उत्पादनात वाढ होत असते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणारा मच्छीमार आपल्या नौका शाकारुन त्यांच्या डागडुजी करून पुन्हा मासेमारीसाठी सज्ज करीत असतो. ३१ जुलैपऱ्यंत मासेमारी व जलवाहतूकबंदी घातली असल्याकारणाने मच्छीमार या कालावधीत नौका किनाऱ्यावर शाकारतात. या दोन महिन्याच्या काळात ते आपल्या नौकांची दुरुस्ती, रंगरंगोटी व नवीन जाळी तयार करणे, जुनी जाळी दुरुस्ती करणे या कामात व्यस्त असतात.


खरं तर दरवर्षी राज्यात १५ ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपैकी जो दिवस आधी येईल त्यादिवशी मासेमारीवरची बंदी उठवली जाते पण इतर राज्यांतील बंदी १ ऑगस्ट रोजी उठत असल्याने परराज्यातील मच्छीमार या ठिकाणी येऊन मच्छिमारी करतात त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे देशभरात सर्व समुद्रकिनारी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मच्छीमारी बंदी घातली आहे. जीवावर उदार होऊन मासेमारी करून आपली उपजीविका करणाऱ्या मासेमारांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संख्या आहे. या मासेमारी व्यवसायातून देशाला मोठे परकीय चलन मिळते.

Comments
Add Comment

पन्हळघर झोरेवाडीत ढगफुटी सदृश्य पाऊस; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

माणगाव : रायगड जिल्ह्याला 'शक्ती' वादळाचा इशारा देण्यात आलेला असतानाही संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर कडक ऊन जाणवत

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याचे काम रायगड जिल्हा परिषदेचे असले, तरी जिल्हा परिषदेत

पनवेल महापालिकेचा ९ वा वर्धापन दिन उत्साहात

पनवेल : पनवेल महापालिकेने ९ वर्षामध्ये देशपातळीवरती विविध सन्मान प्राप्त केले. महापालिकेची वास्तू जशी आयकॉनीक

मुंबई-काशिद रो-रो सेवा रखडली

वादळ, वारे, उसळणाऱ्या लाटांमुळे कामात अडथळा नांदगाव मुरुड : मुंबई-काशिद रो-रो सेवेचे गेल्या पाच वर्षांपासून संथ

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली