नौका लागल्या मुरुड समुद्रकिनारी

मुरुड (वार्ताहर) : १ जूनपासून सरकारने मासेमारी करण्यासाठी बंदी घातली आहे. त्यामुळे मुरुड बंदरामध्ये मच्छीमार बांधवांनी आपापल्या नौका शाकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुरुड समुद्रकिनारा कोळी बांधवांनी गजबजून गेला आहे. तालुक्यातील असंख्य नौका आता तब्बल दोन महिन्यांची विश्रांती घेणार आहेत.


जून-जुलै हा महिना माशांचा प्रजननाचा आणि अंडी देण्याचा कालावधी असल्याकारणाने या दोन महिन्यात माशांच्या उत्पादनात वाढ होत असते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणारा मच्छीमार आपल्या नौका शाकारुन त्यांच्या डागडुजी करून पुन्हा मासेमारीसाठी सज्ज करीत असतो. ३१ जुलैपऱ्यंत मासेमारी व जलवाहतूकबंदी घातली असल्याकारणाने मच्छीमार या कालावधीत नौका किनाऱ्यावर शाकारतात. या दोन महिन्याच्या काळात ते आपल्या नौकांची दुरुस्ती, रंगरंगोटी व नवीन जाळी तयार करणे, जुनी जाळी दुरुस्ती करणे या कामात व्यस्त असतात.


खरं तर दरवर्षी राज्यात १५ ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपैकी जो दिवस आधी येईल त्यादिवशी मासेमारीवरची बंदी उठवली जाते पण इतर राज्यांतील बंदी १ ऑगस्ट रोजी उठत असल्याने परराज्यातील मच्छीमार या ठिकाणी येऊन मच्छिमारी करतात त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे देशभरात सर्व समुद्रकिनारी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मच्छीमारी बंदी घातली आहे. जीवावर उदार होऊन मासेमारी करून आपली उपजीविका करणाऱ्या मासेमारांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संख्या आहे. या मासेमारी व्यवसायातून देशाला मोठे परकीय चलन मिळते.

Comments
Add Comment

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी

१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या