नौका लागल्या मुरुड समुद्रकिनारी

मुरुड (वार्ताहर) : १ जूनपासून सरकारने मासेमारी करण्यासाठी बंदी घातली आहे. त्यामुळे मुरुड बंदरामध्ये मच्छीमार बांधवांनी आपापल्या नौका शाकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुरुड समुद्रकिनारा कोळी बांधवांनी गजबजून गेला आहे. तालुक्यातील असंख्य नौका आता तब्बल दोन महिन्यांची विश्रांती घेणार आहेत.


जून-जुलै हा महिना माशांचा प्रजननाचा आणि अंडी देण्याचा कालावधी असल्याकारणाने या दोन महिन्यात माशांच्या उत्पादनात वाढ होत असते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणारा मच्छीमार आपल्या नौका शाकारुन त्यांच्या डागडुजी करून पुन्हा मासेमारीसाठी सज्ज करीत असतो. ३१ जुलैपऱ्यंत मासेमारी व जलवाहतूकबंदी घातली असल्याकारणाने मच्छीमार या कालावधीत नौका किनाऱ्यावर शाकारतात. या दोन महिन्याच्या काळात ते आपल्या नौकांची दुरुस्ती, रंगरंगोटी व नवीन जाळी तयार करणे, जुनी जाळी दुरुस्ती करणे या कामात व्यस्त असतात.


खरं तर दरवर्षी राज्यात १५ ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपैकी जो दिवस आधी येईल त्यादिवशी मासेमारीवरची बंदी उठवली जाते पण इतर राज्यांतील बंदी १ ऑगस्ट रोजी उठत असल्याने परराज्यातील मच्छीमार या ठिकाणी येऊन मच्छिमारी करतात त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे देशभरात सर्व समुद्रकिनारी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मच्छीमारी बंदी घातली आहे. जीवावर उदार होऊन मासेमारी करून आपली उपजीविका करणाऱ्या मासेमारांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संख्या आहे. या मासेमारी व्यवसायातून देशाला मोठे परकीय चलन मिळते.

Comments
Add Comment

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील