यूपीएससी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

मुंबई : यूपीएससी २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यूपीएससी तर्फे जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये श्रुती शर्माने ऑल इंडिया रँकमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.


यूपीएससी सीएसई प्राथमिक परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी झाली आणि परीक्षेचा निकाल २९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. मुख्य परीक्षा २०२२ हा ७ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आली आणि निकाल १७ मार्च २०२२ रोजी घोषित करण्यात आला. ५ एप्रिलपासून सुरू झालेल्या आणि २६ मे रोजी संपलेल्या यूपीएससी परीक्षेची मुलाखत ही शेवटची फेरी होती.


प्रिलिम्स, मेन्स आणि त्यानंतर मुलाखतीच्या सर्व परीक्षा पास जरून यूपीएससी तर्फे देशातून ६८५ उमेदवारांना अपॉईंट करण्यात येणार आहे. यामध्ये Indian Administrative Service; Indian Foreign Service, Indian Police Service and Central Services, Group ‘A’ and Group ‘B’ या विभागांसाठी उमेदवारांची निवड केली आहे.


यामध्ये २४४ उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील आहेत तर ७३ उमेदवार हे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील आहेत. २०३ उमेदवार हे ओबीसी प्रवर्गातील आहेत तर १०५ उमेदवार हे एससी प्रवर्गातील आहेत. एसटी प्रवर्गातील ६० उमेदवार आहेत असे एकूण ६८५ उमेदवार हे सिव्हिल सर्व्हिसेससाठी अपॉईंट करण्यात येणार आहेत. तसेच यूपीएससी तर्फे ६३ उमेदवारांना रिझर्व्ह विभागात ठेवण्यात आले आहे.


आज जाहीर झालेल्या अंतिम निकालात श्रुती शर्माने ऑल इंडिया रँक १ मिळवला आहे. या वर्षी सर्व टॉप तीन पोझिशन्स मुली उमेदवारांनी मिळवल्या आहेत. श्रुती सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे आणि ती जामिया मिलिया इस्लामिया निवासी कोचिंग अकादमीमध्ये यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करत आहे.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर