प्रधानमंत्री यांनी साधला देशातील अनाथ बालकांशी संवाद

पालघर (प्रतिनिधी) : पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत महत्त्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील अनाथ बालके यावेळी उपस्थित होते. त्यांना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.


तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. पुस्तक हे तुमचे मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वत:वर विश्वास ठेवा. फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जा. योगासनांना आपल्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान द्या, असा संदेश पंतप्रधानांनी यावेळी बालकांना उद्देशून दिला.


जिल्हाधिकारी श्री. गुरसळ यांनी यावेळी बालकांना जिल्हा प्रशासन शिक्षणात खंड पडू देणार नाही असा धीर देत चांगला अभ्यास करा आणि उत्तम भविष्य निर्माण करा, असा सल्ला दिला. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंद होत्या. मात्र शिक्षण ऑनलाइन सुरू होते आता जूनपासून नविन शैक्षणीक वर्ष सुरू होईल आणि शाळाही प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत.


त्यामुळे चांगले नागरिक बनण्यासाठी शिक्षणाची कास धरा. समाज आपल्यासोबत आहे. तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी बालकांना धीर देताना सांगितले.

Comments
Add Comment

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या

अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा

पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या

कोट्यवधींचा शिक्षण कर वसूल; शाळा हस्तांतरण मात्र रखडलेलेच

महापालिकेत शिक्षण समिती व सभापती नसण्याची परंपरा कायम राहणार गणेश पाटील विरार : महापालिकेची स्थापना होऊन १६

मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना

महापौरांना ७५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता

उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजार विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना