प्रधानमंत्री यांनी साधला देशातील अनाथ बालकांशी संवाद

  113

पालघर (प्रतिनिधी) : पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत महत्त्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील अनाथ बालके यावेळी उपस्थित होते. त्यांना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.


तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. पुस्तक हे तुमचे मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वत:वर विश्वास ठेवा. फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जा. योगासनांना आपल्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान द्या, असा संदेश पंतप्रधानांनी यावेळी बालकांना उद्देशून दिला.


जिल्हाधिकारी श्री. गुरसळ यांनी यावेळी बालकांना जिल्हा प्रशासन शिक्षणात खंड पडू देणार नाही असा धीर देत चांगला अभ्यास करा आणि उत्तम भविष्य निर्माण करा, असा सल्ला दिला. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंद होत्या. मात्र शिक्षण ऑनलाइन सुरू होते आता जूनपासून नविन शैक्षणीक वर्ष सुरू होईल आणि शाळाही प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत.


त्यामुळे चांगले नागरिक बनण्यासाठी शिक्षणाची कास धरा. समाज आपल्यासोबत आहे. तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी बालकांना धीर देताना सांगितले.

Comments
Add Comment

खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील

जिल्ह्यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात

सहा हजार हेक्टरवर भातपेरणी, जिल्ह्यात ८९ हजार हेक्टरवर होणार भाताची लागवड अलिबाग  : पावसाळ्याला यंदा मे

आणीबाणी काळ म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई !

पालघर: संपूर्ण देशात लोकशाही मजबूत होत असताना २५ जून १९७५ रोजी संविधानाची हत्या करून आणीबाणी लागू केली. या

सूर्या प्रकल्पातून वाढीव पाणी मिळणार नाही

पालघरसह २० गावांना शोधावा लागणार दुसरा पर्याय गणेश पाटील पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्रासह नजीकच्या २० गावांना

मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी एनएचआयला पत्र

व्हाईट टेपिंगच्या निकृष्ट कामामुळे अपघात तलासरी : मुंबई-अहमदाबादबाद महामार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत,

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत?

सफाळे: पालघर जिल्ह्यातील मांडे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-अहमदाबाद अतिजलद (बुलेट ट्रेन) प्रकल्पाचे काम वेगाने