कोसेसरी भवाडीतील नागरिकांचा प्रवास धोकादायक


  • सूर्या नदी पार करताना तराफा, नावेचा आधार

  • पावसाळ्यात विद्यार्थी, नागरिकांचे हाल

  • कायमस्वरूपी पूल बांधण्याची गरज


कासा (वार्ताहर) : डहाणू तालुक्यातील कोसेसरी भवाडी येथील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून सूर्या नदीतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या नदीवर पूल बांधून देण्याची मागणी नागरिक करत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता काही उपाययोजण्याची मागणीही पालकांकडून करण्यात येत आहे.


कोसेसरी गावाजवळून सूर्या नदी वाहते. ही नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. त्यामुळे कोसेसरी भवाडी आणि लगतच्या तीन-चार गावातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी कासा येथे यावे लागते. शाळेत जाण्यासाठी मुलांना तराफ्यात किंवा लाकडी नावेत बसून नदी ओलांडून जावे लागते. मागील अनेक वर्षापासून या नदीवर पूल व्हावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. पण याकडे कुणीच लक्ष दिले नाही, असे ग्रामस्थ सांगतात.


कासा किंवा तलवाडा येथे येण्यासाठी दुसरीकडून १५ ते २० किलोमीटर वळसा घालून यावे लागते. त्यात तेथून प्रवासी वाहनांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थी या नदी पात्रातून प्रवास करतात. त्यांचा प्रवास धोकादायक असल्याचे पालक सांगतात. मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा प्रवास अशाच प्रकारे सुरु असून रोज ३५ ते ४० शाळकरी विद्यार्थी असा प्रवास करतात. त्यामुळे हा धोकादायक प्रवास सुखकर व्हावा यासाठी नदीवर पूल बांधण्याची मागणी गावकरी करत आहेत.


अनेक वर्षापासून कोणतेही काम सुरू झाले नाही. या भागात अनेक नेते, पदाधिकारी पाहणी करतात. काही सामाजिक संस्था देखील आल्या. त्यांनी लाईफ जॅकेट, नदी किनारी पायऱ्या यांची मदत केली. पण येथे कायमस्वरूपी पूल उभारला गेला तरच हा प्रश्न सुटणार आहे.


कोसेसरी भवाडी येथील शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थ यांना कासा येथे येण्यासाठी दररोज सूर्या नदीतून लाकडी होडीचा उपयोग करून जावे लागते. येथे कायमस्वरूपी पूल बांधावा यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी या परिसरातील अनेक ग्रामपंचायतीतर्फे ठराव दिलेले आहेत. प्रशासनाने लवकर पूल बांधून द्यावा.-शैलेश करमोडा, जि. प. सदस्य, ओसरवीरा गट
Comments
Add Comment

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या

अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा

पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या

कोट्यवधींचा शिक्षण कर वसूल; शाळा हस्तांतरण मात्र रखडलेलेच

महापालिकेत शिक्षण समिती व सभापती नसण्याची परंपरा कायम राहणार गणेश पाटील विरार : महापालिकेची स्थापना होऊन १६

मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना

महापौरांना ७५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता

उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजार विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना

वसई-विरार महापालिकेत महापौर पदासाठी ७ अर्ज

उपमहापौर पदासाठी ५ अर्ज विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल