भाजपचे आजपासून १४ जूनपर्यंत देशव्यापी जनसंपर्क अभियान

  73

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपचे केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्य सरकारांच्या सर्व मंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी देशव्यापी जनसंपर्क अभियान हाती घेणार आहेत. त्याअंतर्गत सरकारने गरिबांच्या कल्याणार्थ राबविलेल्या विविध योजना आणि सुप्रशासनाची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचविण्यात येणार आहे, असे भाजपतर्फे सांगण्यात आले.


भाजप मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी मोदींचे वर्णन ‘विश्वासार्ह, लोकप्रिय, निर्णायक, त्याग करणारा आणि तपस्वी नेता’, असे करून अवघे राष्ट्र त्यांच्यामागे उभे असल्याचे सांगितले. सिंग यांनी सांगितले, की, मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजप ३० मेपासून पंधरवडा साजरा करणार आहे. ३० मे ते १४ जूनपर्यंत मोदी सरकारचे प्राधान्य असलेल्या सुप्रशासन आणि गरीब कल्याण योजनांवर भर देत व्यापक जनसंपर्क अभियान आयोजित केले आहे. त्याचा एक भाग म्हणून ७५ तासांची स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील जनसंपर्क मोहीम राबवण्यात येईल.


त्यात सर्व केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांतील मंत्री आणि पक्षाचे गावोगावांतील सर्व लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या पंधरवड्यातील प्रत्येक दिवशी शेतकरी, महिला, अनुसूचित जाती- जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपक्रम राबवण्यात येतील. कोरोनाच्या साथीत पालकांच्या मृत्यूमुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी ३० मे रोजी मोदी मदतनिधीचा धनादेश देतील.शिष्यवृत्ती योजनाही ते यावेळी जाहीर करतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Comments
Add Comment

जम्मूला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंग न करताच दिल्लीला परतले, कारण...

नवी दिल्ली: श्रीनगरला जम्मूमार्गे जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान आयएक्स-२५६४ सोमवारी दिल्लीला माघारी

धक्कादायक! पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी नाडियामध्ये बॉम्बस्फोटात ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे दिले आश्वासन कोलकाता : पश्चिम बंगालच्या नाडिया

राजा रघुवंशी हत्येला नवे वळण : हत्येपूर्वी सुरू केली होती कंपनी

शिलॉन्ग : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे , हत्येच्या आधी दोघांनी मिळून कंपनी सुरू केली

Fact Check: इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडून भारतीय एअरस्पेसचा वापर? भारताने फेटाळला दावा

भारताने फेटाळला दावा नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इराण आणि इस्त्रायलच्या वादात आता

युद्धनौका ‘तामाल’ नौदलात दाखल होणार

नवी दिल्ली : रशियाच्या कॅलिनिनग्रांड येथे १ जुलै २०२५ रोजी आयोजित समारंभात तमाल युद्धनौका भारतीय नौदलाच्या

पावसाळ्यातही सुरू राहिल नक्षलविरोधी मोहिम- अमित शाह

रायपूर : नक्षलवादी पावसाळ्यात घनदाट जंगलात लपून बसतात. परंतु, यंदा पावसाळ्यातही नक्षलवाद्यांच्या विरोधातील