सिक्कीमला पर्यटनासाठी गेलेल्यांची कार दरीत कोसळली, ठाण्याच्या ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

ठाणे (प्रतिनिधी) : सिक्कीम येथे फिरण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील पर्यटकांची गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात टेंभी नाका येथील एकाच कुटुंबातील चार जणांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने टेंभी नाका येथील जैन समाजावर शोककळा पसरली आहे.


सुरेश पुनमिया (४०), तोरण पुनमिया (३८), हिरल पुनमिया (१४), देवांश पुनमिया (१०) आणि जयन परमार (१३) अशी नावे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ठाण्यातील पर्यटकांची आहेत. ठाण्यातील पाच कुटुंबातील १८ जण २६ मे रोजी सकाळी विमानाने सिक्कीम येथे फिरायला गेले होते. त्यामध्ये टेंभी नाका येथील ओशो महावीर गृहनिर्माण सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सुरेश पुनमिया यांच्या परिवाराचा समावेश होता तसेच खोपट येथील सीएनजी पंप परिसरात राहणारे अमित परमार हे त्यांची पत्नी आणि मुलगा जयन यांच्यासह इतर तीन कुटुंबेही त्यात होते.


२८ मे रोजी सकाळी हे सर्व जण तीन गाड्या घेऊन पर्यटन स्थळे पाहण्यासाठी गेले होते. दोन गाड्या हॉटेलवर पोहोचल्या होत्या, परंतु एक गाडी रात्री उशिरापर्यंत हॉटेलवर परत आली नाही, त्यामुळे इतर सर्वांना काळजी वाटू लागली होती. मागील गाडीत अमित परमार यांचा मुलगा जयन होता, त्यामुळे त्याच्या आईला देखिल काळजी वाटत होती. या सर्वांनी तेथील स्थानिक पोलिसांना गाडीबद्दल माहिती दिली. सकाळी येथील पोलिसांनी या पर्यटकांना माहिती दिली की उत्तर सिक्कीम भागातील खोडांग येथील २५० मीटर खोल दरीत त्यांची कार कोसळून त्यामध्ये वाहन चालकासह पाच पर्यटकांचा मृत्यू झाला.


स्थानिक पोलीस आणि सैन्य दलातील जवान यांनी दरीत कोसळलेली कार बाहेर काढली. त्यांचे मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच ठाण्यातील त्यांच्या नातेवाईकांनी सिक्कीमला धाव घेतली असून या सर्वांचे मृतदेह उद्या दुपारी ठाण्यात आणण्यात येणार असल्याचे टेंभी नाका येथील गुणवंत यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये