चलनात २ हजाराच्या नोटा घटल्या तर ५०० रुपयांच्या वाढल्या

  36

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांत अर्थव्यवस्थेतून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याचे निरीक्षण नुकतेच आरबीआयने नोंदविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपये किमतीची नवीन नोट चलनात आणली होती. पण मागील काही दिवसांत अर्थव्यवस्थेतून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याचे निरीक्षण नुकतेच आरबीआयने नोंदविले आहे.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मार्च २०२२ च्या संपलेल्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटात १२.६० टक्क्यांची घट झाली आहे. सध्या बाजारात २ हजार रुपयांच्या २१ हजार ४२० लाख नोटा आहेत. गेल्या वर्षी हा आकडा २४ हजार ५१० लाख इतका होता, तर २०२० मध्ये अर्थव्यवस्थेत २७ हजार ३९८ लाख २ हजार रुपयांच्या नोटा होत्या. गेल्या दोन वर्षांत चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांच्या संख्येत २१.८१ टक्क्यांनी घट झाली आहे.


विशेष म्हणजे आरबीआयने गेल्या चार वर्षात दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांचा पुरवठा केलेला नाही. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर आरबीआयने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करत २,००० रुपयांची नोट बाजारात आणली होती. तसेच २०१६ मध्ये नव्याने डिझाइन केलेली ५०० रुपयांची नोटही आरबीआयने बाजारात आणली होती.


आरबीआयच्या म्हणण्यानुसार, चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांचे मूल्य मार्च २०२२ मध्ये १२.६० टक्क्यांनी घसरून ४,२८,३९४ कोटी रुपयांवर आले आहे. जे गेल्या वर्षी ४,९०,१९५ कोटी रुपये इतके होते, तर दुसरीकडे, मार्च २०२२ मध्ये चलनात असलेल्या ५०० रुपयांच्या नोटांची संख्या वाढली असून सध्या बाजारात ४,५५,४६८ लाख ५०० रुपयांच्या नोटा आहेत. मागील वर्षी बाजारात ३,८६,७९० लाख नोटा होत्या, अशी माहिती मध्यवर्ती बँकेने आपल्या वार्षिक अहवालात दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात आरबीआयने ५०० रुपयांच्या १,२८,००३ नोटांचा पुरवठा केला होता, असेही आरबीआयने म्हटले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : महायुतीचा विजय हिंदूंच्या मतांवर, बाकी धर्मियांचे मतदान शून्य : मंत्री नितेश राणे

रत्नागिरी : रत्नागिरीतील चिपळूण येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने झालेल्या राखी संकलन कार्यक्रमात राज्याचे

कबुतरखान्यावर तोडगा काढणार १२ तज्ज्ञांची समिती

मुंबई : कबुतरखान्यांमुळे मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर

Devendra Fadnavis BDD Chawl : 'छप्पर गळतंय, भिंती पडतायत'… BDD रहिवाशांचा मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलेला हृदयद्रावक किस्सा

मुंबई : वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्याला आज ऐतिहासिक वळण मिळाले. मुख्यमंत्री

कबुतरखान्यावर राज ठाकरेंची पहिली सडेतोड प्रतिक्रिया "या वादात लोढा-बिढांनी येऊ नये"

मुंबई : गेल्या काही दिवसापासून दादरमधील कबुतरखाना वाद पेटला असून कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाज चांगलाच

Shilpa Shetty And Raj Kundra : ६० कोटींचा घोटाळा? शिल्पा-राज पुन्हा कोर्टाच्या दारात, आता काय केलं नेमकं?

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) वादाच्या भोवऱ्यात अडकले

Shilpa Shirodkar Car Accident : बिग बॉस १८’ फेम शिल्पा शिरोडकरचा कार अपघात; बसची कारला जोरदार धडक, पोस्ट शेअर म्हणाली...

मुंबई : ‘बिग बॉस १८’मुळे (Bigg Boss 18) पुन्हा एकदा चर्चेत आलेली आणि आपल्या सौंदर्यानं नव्वदच्या दशकात गाजवलेली