माथेरानमध्ये दोन दिवस अश्व शर्यतीचा थरार

नेरळ (वार्ताहर) : माजी नगराध्यक्ष प्रदीप दिवाडकर यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या माथेरान युथ सोशल क्लब कडून पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल अशा अश्व शर्यती येत्या शनिवार आणि रविवारी माथेरान क्या ओलपिया रेस्कोर्स मैदानावर होणार आहेत. माथेरान गिरिस्थान नगर परिषद गेली काही वर्षे या अश्व शर्यतींना पालिकेचे प्रोत्साहन देत सहभागी होत असतात. २८ आणि २९ मे रोजी या अश्व शर्यती होणार असून अश्व शर्यती बरोबर अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात.


माथेरान हे जागतिक दर्जाचे सुंदर पर्यटनस्थळ असून उन्हाळ्यात थंड हवा, हिवाळ्यात गुलाबी थंडी आणि पावसाळ्यात धुक्यात दाटलेले माथेरान अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला येत असतात. उन्हाळी पर्यटन हंगामात मे महिन्यात माथेरानमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक घोडेस्वार यांच्यासाठी माथेरान नगर परिषद आणि माथेरान युथ सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या अश्व शर्यती आणि खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.


दोन दिवस चालणाऱ्या अश्व शर्यतीमध्ये गॅलपिंग, ट्रॉटिंग, म्युझिकल बॉल अँड बकेट, सडलिंग युअर हॉर्स, टग ऑफ वॉर, गॅलपिंग गोल्फ ऑन हॉर्सबॅक म्युझिकल मग्स ऑन हॉर्सबॅक, टॅट पेंगिंग तसेच येथील आदिवासी घोडेस्वार तसेच स्थानिक आदिवासी यांच्या धावण्याची शर्यत लहान मुलांसाठी सॅक रेस, मुले आणि मुली यांच्यासाठी फ्लॅट रेस आणि पर्यटकांसाठी रिले रेस आदी स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग