आयपीएलच्या फायनलसाठी जंगी तयारी!

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचा अंतिम सामना रविवार २९ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने यंदा आयपीएलची सांगता दणक्यात होणार आहे. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याचे समजते. सुरक्षेसाठी स्टेडियम परिसरात तब्बल ६ हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.


या सामन्यापूर्वी सांगता कार्यक्रम होणार असून हा सामना इतर सामन्यांच्या तुलनेत अर्धा तास उशीरा सुरू होणार आहे. म्हणजेच रात्री ८ वाजता अंतिम सामना होणार आहे. साडेसात वाजता नाणेफेक होईल.


मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी समारोप कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असेल. आयपीएलचा क्लोजिंग समारोप २९ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे. हा कार्यक्रम ५० मिनिटांपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.


कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलच्या सामन्यांवर निर्बंध होते. पण यंदा कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने आयपीलच्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी दिली होती. आता आयपीएल २०२२ स्पर्धा अंतिम टप्प्यात असून रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याची जंगी तयारी करण्यात आली आहे.


यावेळी ६ हजार पोलीस स्टेडियम परिसरात तैनात करण्यात येणार आहेत. तसेच राजकारण, चित्रपट अशा विविध क्षेत्रातील दिग्गज यावेळी उपस्थित राहणार असल्याचे समजते. आयपीएलचा क्लोजिंग समारोप २९ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे. यंदा कोरोना नियंत्रणात असल्याने आयपीएलची सांगता दणक्यात होणार आहे.

Comments
Add Comment

भारत १९ वर्षांखालील आशिया कप फायनलमध्ये विक्रमी नवव्यांदा विजय मिळवण्याकडे भारताचे लक्ष्य...

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना आज, २१ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयुष

भारत-श्रीलंका महिला संघांमध्ये टी-२० चा रणसंग्राम

आजपासून मालिकेला सुरुवात विश्वचषक संघ निवडीसाठी खेळाडूंची कसोटी विशाखापट्टनम : २०२६ च्या महिला टी-२०

दुबईत रविवारी भारत-पाक आमने-सामने, आशिया चषकावर कोण नाव कोरणार ?

दुबई  : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि पारंपरिक लढत पुन्हा एकदा अंतिम सामन्याच्या निमित्ताने रंगणार आहे.

टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; गिलला वगळले

मुंबई : भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजीत करत असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक २०२६ साठी बीसीसीआयच्या निवड

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?

मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा

भारताचा मालिका विजय

हार्दिक-तिलकच्या वादळानंतर गोलंदाजांचा कहर; विश्वचषकाच्या तयारीला बळ अहमदाबाद  : नरेंद्र मोदी स्टेडियमवर