डोंगर पायथ्याखालील रहिवाशांना नोटिसा

कर्जत (वार्ताहर) : कर्जत नगर परिषदेने शहरातील सात इमारती आणि जीर्ण झालेली चाळ आणि मुद्रे, भिसेगाव आणि गुंडगे येथील टेकडी खाली राहणाऱ्या रहिवाशांनी घर सोडून अन्य ठिकाणी स्थलांतर होण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गुजराथी इमारत, डागा बिल्डिंग, इंद्रस, पिंपुटकर वाडा, भुसारी चाळ, सिकंदर चाळ, तेलवणे बिल्डिंग या इमारती आणि चाळींना नोटीस बजावल्या आहेत. मुद्रे येथील डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या २७ घरांना नोटीस बजावली, तर गुंडगे येथील ४३, भिसेगाव येथील २४ घरांना नोटीस काढून घर सोडण्यास सांगितले आहे.


२०२० मध्ये पूर आला होता त्यावेळेस नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे टेकडीलगत संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली होती. नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी मासिक सभेत टेकडीलगत संरक्षक भिंत उभारण्याचा ठराव घेतला होता. मग नगर परिषदेने त्या ठरावाचे केले काय? असा सवाल नागरिक विचारत आहे.


भिसेगाव येथील नागरिकांनी नगर परिषदेचे लक्ष्मण माने यांच्याशी संवाद साधला, तर सांगण्यात आले की, आमच्याकडे निधी नाही. ज्यांना भिंत पाहिजे त्यांनी निधी उपलब्ध करून द्या. बांधकाम नगर परिषद करेल. नगर परिषदेने १४० घरे टेकडी पायथ्याशी आहेत. अशांना नोटीस बजावली आहे. दरड/माती कोसळून घराचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी घर सोडून अन्य ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी अन्यथा जीवितहानी झाल्यास नगर परिषद जबाबदार नसेल असे पत्र आपत्तीग्रस्त असणाऱ्यांना दिल्याने नगर परिषदेने हात वरती केले आहेत.


अंधाधुंद कारभाराकडे आमदारांचे दुर्लक्ष


नगर परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी विकासाच्या नावाखाली लाखोंची उधळपट्टी करतात. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविल्या जात नाहीत. याकडे आमदार थोरवे यांनी लक्ष घातले पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहे.


स्थानिक नगरसेवकांना समस्या माहीत असूनही त्यांनी ते सोडविणे क्रमप्राप्त होते. मात्र न. प. च्या लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांच्या अंतर्गत वादामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणे हे लोकप्रतिनिधींना कितपत योग्य वाटते. - पूजा कांबळे (गुंडगे)

Comments
Add Comment

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी

१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या