डोंगर पायथ्याखालील रहिवाशांना नोटिसा

कर्जत (वार्ताहर) : कर्जत नगर परिषदेने शहरातील सात इमारती आणि जीर्ण झालेली चाळ आणि मुद्रे, भिसेगाव आणि गुंडगे येथील टेकडी खाली राहणाऱ्या रहिवाशांनी घर सोडून अन्य ठिकाणी स्थलांतर होण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गुजराथी इमारत, डागा बिल्डिंग, इंद्रस, पिंपुटकर वाडा, भुसारी चाळ, सिकंदर चाळ, तेलवणे बिल्डिंग या इमारती आणि चाळींना नोटीस बजावल्या आहेत. मुद्रे येथील डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या २७ घरांना नोटीस बजावली, तर गुंडगे येथील ४३, भिसेगाव येथील २४ घरांना नोटीस काढून घर सोडण्यास सांगितले आहे.


२०२० मध्ये पूर आला होता त्यावेळेस नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे टेकडीलगत संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली होती. नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी मासिक सभेत टेकडीलगत संरक्षक भिंत उभारण्याचा ठराव घेतला होता. मग नगर परिषदेने त्या ठरावाचे केले काय? असा सवाल नागरिक विचारत आहे.


भिसेगाव येथील नागरिकांनी नगर परिषदेचे लक्ष्मण माने यांच्याशी संवाद साधला, तर सांगण्यात आले की, आमच्याकडे निधी नाही. ज्यांना भिंत पाहिजे त्यांनी निधी उपलब्ध करून द्या. बांधकाम नगर परिषद करेल. नगर परिषदेने १४० घरे टेकडी पायथ्याशी आहेत. अशांना नोटीस बजावली आहे. दरड/माती कोसळून घराचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी घर सोडून अन्य ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी अन्यथा जीवितहानी झाल्यास नगर परिषद जबाबदार नसेल असे पत्र आपत्तीग्रस्त असणाऱ्यांना दिल्याने नगर परिषदेने हात वरती केले आहेत.


अंधाधुंद कारभाराकडे आमदारांचे दुर्लक्ष


नगर परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी विकासाच्या नावाखाली लाखोंची उधळपट्टी करतात. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविल्या जात नाहीत. याकडे आमदार थोरवे यांनी लक्ष घातले पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहे.


स्थानिक नगरसेवकांना समस्या माहीत असूनही त्यांनी ते सोडविणे क्रमप्राप्त होते. मात्र न. प. च्या लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांच्या अंतर्गत वादामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणे हे लोकप्रतिनिधींना कितपत योग्य वाटते. - पूजा कांबळे (गुंडगे)

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग