बियाण्यांसाठीच्या टोकन वाटपात गोंधळ

  58

वाडा (वार्ताहर) : वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी भातबियाणे सवलतीत वाटप करण्यात आले. मात्र या वाटपावेळी कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना अनेक तास उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. वाडा पंचायत समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी भातबियाणे वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर करून बियाणे वाटपावेळी गर्दी टाळण्यासाठी अगोदर टोकन देण्याचे नियोजन केले होते.


जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे गुरुवारी प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांची नाव नोंदणी करून टोकन देण्यात आले. हे टोकन दाखवून बियाणे मिळणार होते. टोकन देण्यासाठी सकाळीच तीन टेबल लावून रांग लावणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता एकच टेबल लावल्याने लाभार्थ्यांची गर्दी झाली.


शेवटी गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आले. पाच वाजेपर्यंत पंधराशेच्या वर शेतकऱ्यांना टोकन वाटप केले असून शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना आज शुक्रवारी कार्यालयातून टोकन मिळणार आहे, असे कृषी अधिकारी बी. बी. शिंदे यांनी सांगितले.


सकाळी सात वाजता येऊन रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांना बारा वाजेपर्यंत टोकन मिळाले नाही, तर अर्धा तास आधी आलेला शेतकरी टोकन घेऊन गेला. मी स्वतः चार तास रांगेत उभा होतो, तेव्हा टोकन मिळाले. - सुनील पाटील, शेतकरी

Comments
Add Comment

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना

आठ पंचायत समित्यांचीही अधिसूचना प्रसिद्ध पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना