उरणमध्ये स्वच्छतेचे 'तीनतेरा'


  • भररस्त्यात सुया, इंजेक्शन

  • कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी

  • याप्रकरणी अधिकाऱ्यांचे मौन


उरण (वार्ताहर) : उरण नगरपालिकेच्यावतीने स्वच्छ उरण, सुदंर उरण करण्यासाठी अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात येत आहे. हा सर्व खटाटोप सुरू असताना ज्याठिकाणी कचरा टाकू नये असा बोर्ड लावला आहे त्याच ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकून स्वच्छ उरण, सुंदर उरणच्या संकल्पाला हरताळ फासले आहे.


पॅथॉलॉजीमधील कचरा भररस्त्यात टाकला जात आहे. याकडे लक्ष देण्यास पालिकेच्या आरोग्य विभागाला वेळ नाही. उरण शहरातील आरोग्य विभागाची ज्यांच्याकडे जबाबदारी असे आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांच्याकडे कोणत्याही गोष्टींची माहिती विचारली असता ते सरळ सरळ मी माहिती देऊ शकत नाही, तुम्ही साहेबांना विचारा असे सांगून आपली जबाबदारी झटकतात. त्यामुळे आरोग्याची समस्या बिकट होत चालली आहे.


काही दिवसांपूर्वी दिल्लीची कमिटी शहराची पाहणी करण्यासाठी उरण शहरात आली होती. त्यावेळी राजपाल नाका येथील मुतारी आतमध्ये व्यवस्थित करून बाहेरून बाटलीच्या साह्याने कामगार पाणी सोडताना दिसत होते. कमिटी पाहणी करून गेल्यानंतर पुन्हा मुतारीची परिस्थिती जैसे थे. सध्या त्याठिकाणावरून ये-जा करताना उग्र वासाने नाक मुठीत धरून जावे लागते. उरणमधील अनेक पॅथॉलॉजीमधील सुया व इंजेक्शन भररस्त्यात टाकले जात आहे. याबाबत नगरपालिका अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता तुमचा याबाबत काहीतरी गैरसमज होत असल्याचे उत्तर देऊन वेळ मारून नेतात.

Comments
Add Comment

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,