उरणमध्ये स्वच्छतेचे 'तीनतेरा'


  • भररस्त्यात सुया, इंजेक्शन

  • कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी

  • याप्रकरणी अधिकाऱ्यांचे मौन


उरण (वार्ताहर) : उरण नगरपालिकेच्यावतीने स्वच्छ उरण, सुदंर उरण करण्यासाठी अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात येत आहे. हा सर्व खटाटोप सुरू असताना ज्याठिकाणी कचरा टाकू नये असा बोर्ड लावला आहे त्याच ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकून स्वच्छ उरण, सुंदर उरणच्या संकल्पाला हरताळ फासले आहे.


पॅथॉलॉजीमधील कचरा भररस्त्यात टाकला जात आहे. याकडे लक्ष देण्यास पालिकेच्या आरोग्य विभागाला वेळ नाही. उरण शहरातील आरोग्य विभागाची ज्यांच्याकडे जबाबदारी असे आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांच्याकडे कोणत्याही गोष्टींची माहिती विचारली असता ते सरळ सरळ मी माहिती देऊ शकत नाही, तुम्ही साहेबांना विचारा असे सांगून आपली जबाबदारी झटकतात. त्यामुळे आरोग्याची समस्या बिकट होत चालली आहे.


काही दिवसांपूर्वी दिल्लीची कमिटी शहराची पाहणी करण्यासाठी उरण शहरात आली होती. त्यावेळी राजपाल नाका येथील मुतारी आतमध्ये व्यवस्थित करून बाहेरून बाटलीच्या साह्याने कामगार पाणी सोडताना दिसत होते. कमिटी पाहणी करून गेल्यानंतर पुन्हा मुतारीची परिस्थिती जैसे थे. सध्या त्याठिकाणावरून ये-जा करताना उग्र वासाने नाक मुठीत धरून जावे लागते. उरणमधील अनेक पॅथॉलॉजीमधील सुया व इंजेक्शन भररस्त्यात टाकले जात आहे. याबाबत नगरपालिका अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता तुमचा याबाबत काहीतरी गैरसमज होत असल्याचे उत्तर देऊन वेळ मारून नेतात.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत.