उरणमध्ये स्वच्छतेचे 'तीनतेरा'

  158


  • भररस्त्यात सुया, इंजेक्शन

  • कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी

  • याप्रकरणी अधिकाऱ्यांचे मौन


उरण (वार्ताहर) : उरण नगरपालिकेच्यावतीने स्वच्छ उरण, सुदंर उरण करण्यासाठी अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात येत आहे. हा सर्व खटाटोप सुरू असताना ज्याठिकाणी कचरा टाकू नये असा बोर्ड लावला आहे त्याच ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकून स्वच्छ उरण, सुंदर उरणच्या संकल्पाला हरताळ फासले आहे.


पॅथॉलॉजीमधील कचरा भररस्त्यात टाकला जात आहे. याकडे लक्ष देण्यास पालिकेच्या आरोग्य विभागाला वेळ नाही. उरण शहरातील आरोग्य विभागाची ज्यांच्याकडे जबाबदारी असे आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांच्याकडे कोणत्याही गोष्टींची माहिती विचारली असता ते सरळ सरळ मी माहिती देऊ शकत नाही, तुम्ही साहेबांना विचारा असे सांगून आपली जबाबदारी झटकतात. त्यामुळे आरोग्याची समस्या बिकट होत चालली आहे.


काही दिवसांपूर्वी दिल्लीची कमिटी शहराची पाहणी करण्यासाठी उरण शहरात आली होती. त्यावेळी राजपाल नाका येथील मुतारी आतमध्ये व्यवस्थित करून बाहेरून बाटलीच्या साह्याने कामगार पाणी सोडताना दिसत होते. कमिटी पाहणी करून गेल्यानंतर पुन्हा मुतारीची परिस्थिती जैसे थे. सध्या त्याठिकाणावरून ये-जा करताना उग्र वासाने नाक मुठीत धरून जावे लागते. उरणमधील अनेक पॅथॉलॉजीमधील सुया व इंजेक्शन भररस्त्यात टाकले जात आहे. याबाबत नगरपालिका अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता तुमचा याबाबत काहीतरी गैरसमज होत असल्याचे उत्तर देऊन वेळ मारून नेतात.

Comments
Add Comment

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होईना, इच्छुकांची कोंडी सोडवेना

माथेरान : माथेरान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळीसुद्धा नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेच्या

पनवेल-चिपळूणदरम्यान 6 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या

कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक

"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात