पर्यटकांसाठी जंजिरा किल्ल्याचे दरवाजे बंद


  • मेरिटाइम बोर्ड, पुरातत्व विभागाचे निर्देश

  • आजपासून ऑगस्टपर्यंत राहणार बंद


मुरूड (वार्ताहर) : पावसाळा जवळ आल्याने मुरुडचा सुप्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग किल्ला गुरुवार (ता. २६) पासून पर्यटकांना पाहण्यासाठी बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती मुरूड येथील पुरातत्व खात्याचे अलिबाग-मुरुडचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.


पावसाळ्यात समुद्रात उंच उसळणाऱ्या लाटा, वादळ, हेलकावे यामुळे होऊ शकणारी दुर्घटना टाळण्यासाठी पुरातत्व विभाग आणि मेरिटाइम बोर्ड दरवर्षी पावसाळ्यात सुरक्षितता म्हणून राजपुरी खाडीतील जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवतात. यातून कुणाचाही आनंद हिरावून घेण्याचा अथवा कुणाचेही नुकसान करण्याचा हेतू नाही, अशी माहिती येलीकर यांनी दिली.


उन्हाळी सुट्टी असल्याने जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. प्रतिवर्षी ५ लाख पर्यटक जंजिरा पाहण्यासाठी येतात. २२ एकरवर उभा असणाऱ्या जंजिऱ्यावर १९ बुरुज आहेत. पूर्वी ५१४ तोफा होत्या. त्यातील आता मोजक्याच दिसून येतात. इतिहासात जंजिरा हा अजिंक्य किल्ला अशी नोंद असल्याने जंजिरा पाहण्याचे पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण असते. जंजिरा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील बोटचालक, लाँच मालक यांना उदरनिर्वाहाचे मोठे साधन आहे. त्यामुळे जंजिरा खुला असणे गरजेचे आहे, असे त्यांचे मत आहे.


पर्यटकांच्या सुरक्षेसाठी...

पावसाळा जवळ आला की, समुद्रातील वातावरण बदलत जाते. उसळणाऱ्या लाटा किल्ल्याच्या तटबंदीवर धडकतात. अशावेळी पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. किल्याकडे जाताना एखादी दुर्घटना घडल्यास ही जबाबदारी कोणाची? असा प्रश्न निर्माण होतो. त्यापेक्षा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरातत्व विभागकडून जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना आतून पाहण्यासाठी बंद ठेवण्यात येतो, अशी माहिती येलीकर यांनी दिली.

Comments
Add Comment

पन्हळघर झोरेवाडीत ढगफुटी सदृश्य पाऊस; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

माणगाव : रायगड जिल्ह्याला 'शक्ती' वादळाचा इशारा देण्यात आलेला असतानाही संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर कडक ऊन जाणवत

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याचे काम रायगड जिल्हा परिषदेचे असले, तरी जिल्हा परिषदेत

पनवेल महापालिकेचा ९ वा वर्धापन दिन उत्साहात

पनवेल : पनवेल महापालिकेने ९ वर्षामध्ये देशपातळीवरती विविध सन्मान प्राप्त केले. महापालिकेची वास्तू जशी आयकॉनीक

मुंबई-काशिद रो-रो सेवा रखडली

वादळ, वारे, उसळणाऱ्या लाटांमुळे कामात अडथळा नांदगाव मुरुड : मुंबई-काशिद रो-रो सेवेचे गेल्या पाच वर्षांपासून संथ

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली