ठाण्यात ४३ मुलांच्या रक्तात आढळले हत्तीरोगाचे सूक्ष्मजीव

  83

अतुल जाधव


ठाणे : ठाणे जिल्ह्यात ४३ लहान मुलांच्या रक्तात हत्तीरोगाचे सुक्ष्मजीव आढळून आल्याने हत्तीरोग निवारण कार्यक्रमाला हादरा बसला आहे. त्यापैकी एकट्या भिवंडी तालुक्यात २३ मुले आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेंतर्गत भिवंडी तालुक्यात बुधवार २५ मेपासून ते ५ जून या कालावधीत सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी सांगितले.


राष्ट्रीय कीटकजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम २०२२ अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची सभा उपजिल्हाधिकारी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. महेश नगरे, विभागीय अधिकारी भिवंडी-निजामपूर महानगरपालिका डॉ. प्रीया फडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सईद, ठाणे जिल्ह्याच्या हत्तीरोग अधिकारी दीपाली नासरे आदी उपस्थित होते.


औषधोपचार मोहिमेबाबत माहिती देताना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. नगरे यांनी सांगितले, ऑक्टोबर २०२१ मध्ये सहा ते सात वर्षं वयोगटातील निवडक मुलांची तपासणी करण्यात आली. त्यात ठाणे जिल्ह्यातील ४३ लहान मुलांच्या रक्तात हत्तीरोगाचे सुक्ष्मजीव आढळले असून त्यात भिवंडी तालुक्यातील सर्वाधिक २३ बालके आहेत. त्या आनुषंगाने ठाणे येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्रात दि. २० मे रोजी भिवंडी तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. बालकांना हत्तीरोग मुक्त ठेवण्यासाठी मुले, प्रौढ व्यक्ती व वयोवृद्ध या सर्वांनी हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचे सेवन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भिवंडीमध्ये प्रादुर्भाव अधिक असल्याने या तालुक्यात पुढील दोन वर्षं सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


हत्तीरोग हा क्युलेक्स प्रजातीच्या डासांमार्फत होतो. सेप्टिक टँक, घाण/निचऱ्याच्या जागी व गटारे अशा दुषित पाण्याच्या जागी या डासांची पैदास होते.

Comments
Add Comment

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या