ठाण्यात ४३ मुलांच्या रक्तात आढळले हत्तीरोगाचे सूक्ष्मजीव

अतुल जाधव


ठाणे : ठाणे जिल्ह्यात ४३ लहान मुलांच्या रक्तात हत्तीरोगाचे सुक्ष्मजीव आढळून आल्याने हत्तीरोग निवारण कार्यक्रमाला हादरा बसला आहे. त्यापैकी एकट्या भिवंडी तालुक्यात २३ मुले आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेंतर्गत भिवंडी तालुक्यात बुधवार २५ मेपासून ते ५ जून या कालावधीत सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी सांगितले.


राष्ट्रीय कीटकजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम २०२२ अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची सभा उपजिल्हाधिकारी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. महेश नगरे, विभागीय अधिकारी भिवंडी-निजामपूर महानगरपालिका डॉ. प्रीया फडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सईद, ठाणे जिल्ह्याच्या हत्तीरोग अधिकारी दीपाली नासरे आदी उपस्थित होते.


औषधोपचार मोहिमेबाबत माहिती देताना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. नगरे यांनी सांगितले, ऑक्टोबर २०२१ मध्ये सहा ते सात वर्षं वयोगटातील निवडक मुलांची तपासणी करण्यात आली. त्यात ठाणे जिल्ह्यातील ४३ लहान मुलांच्या रक्तात हत्तीरोगाचे सुक्ष्मजीव आढळले असून त्यात भिवंडी तालुक्यातील सर्वाधिक २३ बालके आहेत. त्या आनुषंगाने ठाणे येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्रात दि. २० मे रोजी भिवंडी तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. बालकांना हत्तीरोग मुक्त ठेवण्यासाठी मुले, प्रौढ व्यक्ती व वयोवृद्ध या सर्वांनी हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचे सेवन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भिवंडीमध्ये प्रादुर्भाव अधिक असल्याने या तालुक्यात पुढील दोन वर्षं सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


हत्तीरोग हा क्युलेक्स प्रजातीच्या डासांमार्फत होतो. सेप्टिक टँक, घाण/निचऱ्याच्या जागी व गटारे अशा दुषित पाण्याच्या जागी या डासांची पैदास होते.

Comments
Add Comment

ठाणे-घोडबंदरच्या वाहतूक कोंडीवर मराठी अभिनेत्याची मिश्कील पोस्ट

ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये माणसांप्रमाणेच वाहनांमध्येही वाढ होत आहे. तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या

आजपासून ९ ऑक्टोबरपर्यंत ठाण्यात १० टक्के पाणीकपात

पाण्याचा काटकसरीने वापर करा : ठामपाचे आवाहन ठाणे (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतर्फे पिसे, पांजरापूर येथील

ठाणे, नवी मुंबई, रायगडमधील कोळी बांधवांचे आर्थिक गणित कोलमडले

ठाणे (प्रतिनिधी) : यंदा पावसाळी मासेमारीबंदी संपुष्टात आल्यानंतर १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारीच्या नव्या

डिझाइन इंजिनीअर बनली मेट्रो पायलट

मुरबाड (वार्ताहर) : मेट्रो रेल्वेने दळणवळणाचा चेहरामोहरा बदलला आहे आणि या आधुनिक प्रवासाचे नेतृत्व आता एका

ही महादेवाची पवित्र भूमी, इथे 'आय लव्ह महादेव' हीच घोषणा चालेल

मीरा रोड : मीरारोड येथील जेपी नॉर्थ गार्डन सिटीमध्ये नवरात्रीच्या काळात गरबा खेळत असलेल्या महिलांवर धर्मांध

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डिसेंबर २०२५ मध्ये होणार सुरू

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय