राणा दाम्पत्याला दिंडोशी न्यायालयाचा दिलासा

  76

मुंबई (प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम प्रकरणी राणा दाम्पत्याला दिंडोशी न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई महापालिकेने राणा दाम्पत्य राहत असलेल्या खार येथील घरात अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस बजावली होती. मात्र आता दिंडोशी न्यायालयाने राणा दाम्पत्याला घरातील अनधिकृत बांधकाम नियमित करून घेण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे.


खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याच्या खार पश्चिम येथील लाव्ही इमारतीतील घरात अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस पालिकेने बजावली होती. त्यानंतर दोन वेळा पालिकेचे पथक तपासणीसाठी गेले हाते. मात्र घरात कोणी नसल्यामुळे तपासणी न करताच पथकाला परतावे लागले होते.


तिसऱ्या वेळी पालिकेच्या पाहणी पथकाला घरात अनधिकृत बांधकाम आढळले. त्यानंतर १५ दिवसांत हे बांधकाम पाडा अन्यथा आम्ही पाडू असा अल्टीमेटम पालिकेने राणा दाम्पत्याला दिला होता. नोटीसीला राणा दाम्पत्याने दिंडोशी न्यायालयात आव्हान दिले होते. दिंडोशी न्यायालयाने राणा दाम्पत्याला घरातील अनधिकृत बांधकाम नियमित करून घेण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आपण आपल्या घरातील बांधकाम नियमित करून घेऊ असे राणा दाम्पत्याने न्यायालयात सांगितले आहे.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.