अचूक पावसाचा अंदाज वर्तवते शेतकऱ्याचे अचूक हवामान खाते

अतुल जाधव


ठाणे : शेतकऱ्यांसाठी पावसाचा अंदाज हा खूप महत्वाचा असतो, पावसाच्या अंदाजावर शेतीच्या विविध कामांचे नियोजन करायचे असल्याने पावसाच्या अंदाजावरच शेतीचे गणित अवलंबून असते. मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांची शेतीची कामे अवलंबून असतात. जसे हवामान खाते करोडो रुपयांच्या अधुनिक मशिन्समधून देखील अचूक अंदाज देत नाही, तर वर्षानुवर्ष ज्या अंदाजावर शेतकरी शेती करतो तो निसर्गाचा अंदाज मात्र कधीच खोटा होत नाही व चुकतही नाही.


शेतकरी शेती लागवडीसाठी निवडलेले उत्तम बियाणे साठवून ठेवतात व मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसात पेरणी केली जाते; परंतु या नक्षत्रांत पेरणी करण्याअगोदर पाण्याचा अचूक अंदाज निसर्गाकडून पशू-पक्ष्यांकडून मिळाल्याशिवाय शेतकरी शेतीची कामांना सुरुवात करत नाहीत. यात पावसाचा अचूक अंदाज देणार व मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बहरून येणार बाव्ह्याचं झाड होय. या झाडाला पिवळी फुले येतात, ती एवढी असतात की झाडाची पाने दिसतच नाहीत, ज्या वेळेस या झाडाला तुरळक फुले येतील, त्या वेळेस पाऊस अवेळी व अल्प समजला जातो, तर बहरून आला तर मुबलक समजला जातो. हा पहिला अंदाज तर मे महिन्यात जर कावळ्याने गावालगतच्या झाडाच्या मजबूत बेचकीयुक्त फांदीवर घरटे बांधले, तर वादळीवारा, विजा कोसळणे धुवाँधार पाऊस होणार आणि जर गावाबाहेरील झाडाच्या शेंड्यावरील फांदीवर घरटे बाधले तर तुरळक सरीचा व कमी पाऊस पडणार. हा झाला कावळ्याचा अंदाज.


शेतावरील मुंग्यानी वारूळ करताना एक ते दीड इंच केले, तर पाऊस कमी पडणार व जर हेच वारून १५-२० इंच करून त्याला तांबड्या मातीने बाहेरून सारवल्या सारखे पॅकबंद केले, तर धुव्वांधार पाऊस चार महिने बरसणारच. अशाच प्रकारे वाळवीच्या झुंडी निघू लागल्या, पतंगाचे थवे उडताना दिसू लागले, तर पाऊस पडणार हे अचूक संकेत मिळाले की, शेतकरी पेरणीला सुरुवात करतो; परंतु या उलट संकेत आले, तर बेभरवशाचा पाऊस म्हणून सावध पवित्रा घेत भातपिकासोबत कमी पावसात येणारी नाचणी, वरई, भूईमुग, मक्यांच कणीस या नगदी पिकावर भर देतात व हा शेकडो वर्षाचा अंदाज अद्यापही अचूक असून याच अंदाजावर शेतकरी तरी खरोखरंच अवलंबून असून तो कधीच फोल ठरत नाहीच


निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजाचे नुकसान


खरीप हंगामात अक्षरश: अवकाळी पावसाने त्राहिमाम् माजवला होता, यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले होते. या दुःखातून कसातरी बळीराजा सावरला आणि रब्बी हंगामाकडे वळला. मात्र रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गाची अवकृपा बघायला मिळाली, हंगामाच्या सुरुवातीला अवकाळी पावसाचे सावट होते, त्यावेळी शेतकरी बांधवांनी योग्य नियोजनाने रब्बीची पिके वाचवली, त्यानंतर अवकाळी पावसाने राज्यात बरेच नुकसान केल्याचे पाहायला मिळाले.

Comments
Add Comment

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डिसेंबर २०२५ मध्ये होणार सुरू

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

बदलापूरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपले

बदलापूर : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सोमवारी पश्चिम

उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून मुलाचा मृत्यू

डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २८ तारखेला रात्री आठ

एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती

मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन

डोंबिवलीत प्रियकराने केली आत्महत्या, पण नेमकं कारण काय? खरंच प्रेयसीसोबत वाद झाला होता का?

प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं? डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या