अचूक पावसाचा अंदाज वर्तवते शेतकऱ्याचे अचूक हवामान खाते

अतुल जाधव


ठाणे : शेतकऱ्यांसाठी पावसाचा अंदाज हा खूप महत्वाचा असतो, पावसाच्या अंदाजावर शेतीच्या विविध कामांचे नियोजन करायचे असल्याने पावसाच्या अंदाजावरच शेतीचे गणित अवलंबून असते. मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांची शेतीची कामे अवलंबून असतात. जसे हवामान खाते करोडो रुपयांच्या अधुनिक मशिन्समधून देखील अचूक अंदाज देत नाही, तर वर्षानुवर्ष ज्या अंदाजावर शेतकरी शेती करतो तो निसर्गाचा अंदाज मात्र कधीच खोटा होत नाही व चुकतही नाही.


शेतकरी शेती लागवडीसाठी निवडलेले उत्तम बियाणे साठवून ठेवतात व मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसात पेरणी केली जाते; परंतु या नक्षत्रांत पेरणी करण्याअगोदर पाण्याचा अचूक अंदाज निसर्गाकडून पशू-पक्ष्यांकडून मिळाल्याशिवाय शेतकरी शेतीची कामांना सुरुवात करत नाहीत. यात पावसाचा अचूक अंदाज देणार व मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बहरून येणार बाव्ह्याचं झाड होय. या झाडाला पिवळी फुले येतात, ती एवढी असतात की झाडाची पाने दिसतच नाहीत, ज्या वेळेस या झाडाला तुरळक फुले येतील, त्या वेळेस पाऊस अवेळी व अल्प समजला जातो, तर बहरून आला तर मुबलक समजला जातो. हा पहिला अंदाज तर मे महिन्यात जर कावळ्याने गावालगतच्या झाडाच्या मजबूत बेचकीयुक्त फांदीवर घरटे बांधले, तर वादळीवारा, विजा कोसळणे धुवाँधार पाऊस होणार आणि जर गावाबाहेरील झाडाच्या शेंड्यावरील फांदीवर घरटे बाधले तर तुरळक सरीचा व कमी पाऊस पडणार. हा झाला कावळ्याचा अंदाज.


शेतावरील मुंग्यानी वारूळ करताना एक ते दीड इंच केले, तर पाऊस कमी पडणार व जर हेच वारून १५-२० इंच करून त्याला तांबड्या मातीने बाहेरून सारवल्या सारखे पॅकबंद केले, तर धुव्वांधार पाऊस चार महिने बरसणारच. अशाच प्रकारे वाळवीच्या झुंडी निघू लागल्या, पतंगाचे थवे उडताना दिसू लागले, तर पाऊस पडणार हे अचूक संकेत मिळाले की, शेतकरी पेरणीला सुरुवात करतो; परंतु या उलट संकेत आले, तर बेभरवशाचा पाऊस म्हणून सावध पवित्रा घेत भातपिकासोबत कमी पावसात येणारी नाचणी, वरई, भूईमुग, मक्यांच कणीस या नगदी पिकावर भर देतात व हा शेकडो वर्षाचा अंदाज अद्यापही अचूक असून याच अंदाजावर शेतकरी तरी खरोखरंच अवलंबून असून तो कधीच फोल ठरत नाहीच


निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजाचे नुकसान


खरीप हंगामात अक्षरश: अवकाळी पावसाने त्राहिमाम् माजवला होता, यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले होते. या दुःखातून कसातरी बळीराजा सावरला आणि रब्बी हंगामाकडे वळला. मात्र रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गाची अवकृपा बघायला मिळाली, हंगामाच्या सुरुवातीला अवकाळी पावसाचे सावट होते, त्यावेळी शेतकरी बांधवांनी योग्य नियोजनाने रब्बीची पिके वाचवली, त्यानंतर अवकाळी पावसाने राज्यात बरेच नुकसान केल्याचे पाहायला मिळाले.

Comments
Add Comment

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत