संभाजीराजे भूमिकेवर ठाम; शिवसेनेची नाकारली ऑफर

Share

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांना पक्ष प्रवेशाची दिलेली ऑफर त्यांनी नाकारली असून ते अपक्ष लढणार ठाम आहेत. गेल्या काही दिवसांपासून संभाजी राजे शिवसेना प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या. त्याला आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यसभेची निवडणूक अटीतटीची होणार आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेचे राजकारण शिगेला पोहोचले आहेत शिवसेनेने दोन जागा लढवण्याचा निर्धार केला आहे, तर छत्रपती संभाजीराजे देखील इच्छुक आहेत. मात्र संभाजीराजे यांना राज्यसभेवर जाण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. महाविकास आघाडी सरकारमुळे शिवसेनेचे मताधिक्य पूर्ण होणार आहे. संभाजी राजेंनी शिवसेनेत यावे अशी अट घालण्यात आली आहे. सोमवारी दुपारी बारा वाजता संभाजीराजेंना वर्षा निवासस्थानी बोलवण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते; परंतु संभाजी राजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे संभाजीराजेंची राज्यसभेवर जाण्याची वाट खडतर बनण्याची शक्यता आहे.

अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम असलेल्या संभाजीराजांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन वेळा भेट घेतली. दोन्ही वेळा शिवसेनेकडून संभाजीराजेंना सेनेतून राज्यसभेवर जाण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र संभाजीराजे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यासाठी ठाम आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही वेळी घेतलेल्या भेटी निष्प्रभ ठरल्या आहेत.

संभाजीराजे अपक्ष लढणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी मराठा संघटनांकडून सुरू आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि एकनाथ शिंदे, नाना पटोले यांच्या मराठा संघटनांकडून भेटीगाठी घेतल्या. महाविकास आघाडी सरकारमधील सर्वांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. मराठा आमदार देखील सेनेच्या पाठीशी उभे आहेत. मराठा संघटनांकडून यामुळे राजकीय पक्षांवर निवडणुकांची भीती दाखवत दबाव वाढवला आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

1 hour ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

2 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

2 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

3 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

4 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

4 hours ago