निधींचा वर्षाव, मात्र ठोस कामे नाहीत

  78

कर्जत (वार्ताहर) : मागील अडीच वर्षांत कर्जत नगर परिषद हद्दीतील विकासकामांसाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमांतून करोडो रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे नगर परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच आमदार यांनी वारंवार जाहीर केले आहे. मात्र जाहीर केलेला निधी आणि प्रत्यक्ष जागेवरील विकासकामे यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे करोडो रुपयांच्या निधीचा वर्षाव होऊनही प्रत्यक्षात ठोस कामे दिसत नसल्याने हा निधी नक्की मुरतो तरी कुठे? असा सवाल कर्जतकरांमध्ये उपस्थित केला जात आहे.


आमदारांचे भाचे तथा नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक संकेत भासे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे ३२ कोटी विकासकामांसाठी मंजूर करून आणले. काही विकासकामांचे भूमिपूजनही झाले आहे. मात्र प्रत्यक्षात येथील काही विकासकामांना अद्यापि मूर्त स्वरूप आलेले नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या निधीतून नक्की कोणती विकासकामे केली, अशी चर्चा नागरिकांत आहे.


कर्जत परिषदेकडे करातून प्राप्त होणाऱ्या निधीतून म्हणजेच नफा फंडातून विविध विकासकामे केल्याचे कागदोपत्री नोंद आहे. मात्र या कामाबद्दलही नगर परिषदेच्या संबंधित प्रशासकीय विभागाकडे विचारणा केली असता तसेच लेखी माहिती मागितली असता माहिती अर्जदाराला देण्यास टाळाटाळ अथवा दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे नफाफंडाच्या माध्यमातून कागदोपत्री दाखविण्यात येणाऱ्या विकासकामांबद्दलही नागरिकांमध्ये शंका-कुशंका निर्माण झाले आहे.


त्यामुळे एकीकडे शहरातील बंद पडलेले उपक्रम म्हणजे वीजनिर्मिती करणारा बायोगॅस प्रकल्प, आमराई येथील रखडलेली स्मशानभूमी, भाजी मंडई, मासळी बाजार तसेच भुयारी गटारे, भुयारी केबल जोडणी आदी महत्त्वाची विकासकामे प्रलंबित असताना त्याच त्याच कामांवर लाखोंचा निधी खर्चाचा अट्टाहास का? असाही प्रश्न नागरिकांना विचार करण्यास भाग पाडत आहे. तसेच यामागे गौडबंगाल आहे का? अशी शंकाही नागरिकांतून उपस्थित केली जाऊ लागली आहे.


एकाच कामांसाठी शासनाचा निधी खर्च करणे योग्य नाही. कर्जत शहरात अनेक महत्त्वाची कामे आहेत, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. - उमेश गायकवाड, (नगरसेवक, कर्जत न. प.)

Comments
Add Comment

बापरे! चालत्या बसचं टायरच आलं बाहेर, थोडक्यात बचावले प्रवासी

बोरिवली-मुरुड एसटी बसचं टायर धावत्या बसमधून आलं बाहेर  महाड : सध्या ठीकठीकाणांहून अपघाताच्या बातम्याच जास्त

कर्जतचे भूमिपुत्र केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदकाचे मानकरी

कर्जत :पोलीस विभागातील कर्जतचे पोलीस उपअधीक्षक सुरेशकुमार राऊत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल या

रायगड जिल्ह्यात अकरावी प्रवेशप्रक्रियेचा गोंधळ संपेना

पोर्टल बंद झाल्यानंतर ऑफलाईन प्रक्रियेवर आशा कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अडवणूक अलिबाग :अकरावी प्रवेशासाठी

उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई कधी होणार?

महापालिकेच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त पनवेल  : उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरील कारवाईकडे पालिका

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये नगरपालिकांच्या निवडणुका

राज्य सरकारकडून प्रभाग रचनेचे आदेश अलिबाग : निवडणूक अयोगाने दिलेल्या आदेशानुसार पनवेल महापालिकेसह अलिबाग, पेण,

‘कोरोना काळात बंद केलेल्या रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करा’

प्रादेशिक रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी कर्जत:कोरोना काळात कर्जत रेल्वे स्थानकावरील