निधींचा वर्षाव, मात्र ठोस कामे नाहीत

कर्जत (वार्ताहर) : मागील अडीच वर्षांत कर्जत नगर परिषद हद्दीतील विकासकामांसाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमांतून करोडो रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे नगर परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच आमदार यांनी वारंवार जाहीर केले आहे. मात्र जाहीर केलेला निधी आणि प्रत्यक्ष जागेवरील विकासकामे यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे करोडो रुपयांच्या निधीचा वर्षाव होऊनही प्रत्यक्षात ठोस कामे दिसत नसल्याने हा निधी नक्की मुरतो तरी कुठे? असा सवाल कर्जतकरांमध्ये उपस्थित केला जात आहे.


आमदारांचे भाचे तथा नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक संकेत भासे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे ३२ कोटी विकासकामांसाठी मंजूर करून आणले. काही विकासकामांचे भूमिपूजनही झाले आहे. मात्र प्रत्यक्षात येथील काही विकासकामांना अद्यापि मूर्त स्वरूप आलेले नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या निधीतून नक्की कोणती विकासकामे केली, अशी चर्चा नागरिकांत आहे.


कर्जत परिषदेकडे करातून प्राप्त होणाऱ्या निधीतून म्हणजेच नफा फंडातून विविध विकासकामे केल्याचे कागदोपत्री नोंद आहे. मात्र या कामाबद्दलही नगर परिषदेच्या संबंधित प्रशासकीय विभागाकडे विचारणा केली असता तसेच लेखी माहिती मागितली असता माहिती अर्जदाराला देण्यास टाळाटाळ अथवा दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे नफाफंडाच्या माध्यमातून कागदोपत्री दाखविण्यात येणाऱ्या विकासकामांबद्दलही नागरिकांमध्ये शंका-कुशंका निर्माण झाले आहे.


त्यामुळे एकीकडे शहरातील बंद पडलेले उपक्रम म्हणजे वीजनिर्मिती करणारा बायोगॅस प्रकल्प, आमराई येथील रखडलेली स्मशानभूमी, भाजी मंडई, मासळी बाजार तसेच भुयारी गटारे, भुयारी केबल जोडणी आदी महत्त्वाची विकासकामे प्रलंबित असताना त्याच त्याच कामांवर लाखोंचा निधी खर्चाचा अट्टाहास का? असाही प्रश्न नागरिकांना विचार करण्यास भाग पाडत आहे. तसेच यामागे गौडबंगाल आहे का? अशी शंकाही नागरिकांतून उपस्थित केली जाऊ लागली आहे.


एकाच कामांसाठी शासनाचा निधी खर्च करणे योग्य नाही. कर्जत शहरात अनेक महत्त्वाची कामे आहेत, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. - उमेश गायकवाड, (नगरसेवक, कर्जत न. प.)

Comments
Add Comment

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी

१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या