अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट

जम्मू : आगामी ३० जून पासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर लश्कर-ए-तोयबाशी संबंधीत ‘द रेजिस्टेंस फ्रंट’ (टीआरएफ) या जिहादी दहशतवादी संघटनेने धमकीचे पत्र जारी केलेय. यात टीआरएफने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केलीय.


या पत्रात टीआरएफने म्हटले आहे की, आम्ही अमरनाथ यात्रेच्याविरोधात नाही. काश्मीरमध्ये येणाऱ्या भाविकांच्याही विरोधात नाही. मात्र, अमरनाथ यात्रेचा वापर हा केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या राजकारणासाठी करणार असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. अमरनाथ यात्रेसाठी १५ हजार ते ८ लाख यात्रेकरूंची नोंदणी ही १५ दिवसांपासून ते ८० दिवसांपर्यंत करण्यात येत आहे. याद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्वयंसेवकांना काश्मीरमधील परिस्थिती चिघळवण्यासाठी पाठवत असल्याचा दावा या दहशतवादी संघटनेने केला आहे. आम्ही कोणत्याही धार्मिक यात्रेच्या विरोधात नाही. मात्र, धार्मिक यात्रांचा वापर काश्मीरमधील संघर्षाविरोधात होत असेल तर आम्ही त्याच्या विरोधात आहोत, असे टीआरएफने धमकावले आहे. अमरनाथ यात्रेसाठी येणारे भाविक सुरक्षित राहतील. मात्र, त्यांनी संघाच्या लोकांना मदत, आश्रय देऊ नये. अन्यथा गंभीर परिणाम होतील अशीही धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे.


जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अमरनाथ यात्रेशी संबंधित सर्व कामे पूर्ण करण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत दिली आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधा आणि योग्य तयारी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रा ३० जूनपासून पहलगाम आणि बालटाल या दोन मार्गांपासून सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

करिष्माच्या मुलांनाही हवाय हिस्सा; संजय कपूरच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा वाद आता कोर्टात

नवी दिल्ली : प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी

उपराष्ट्रपती निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांचा दणदणीत विजय; विरोधकांची मते फुटली?

नवी दिल्ली: भारताला नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन मिळाले आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे

शिक्षक भरतीवेळी महाविद्यालयाच्या आवारात दिसले महाकाय अजगर

अलवर : राजस्थानमधील अलवर येथे अनुदानीत वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होती. ही

२०४० मध्ये चंद्रावर भारतीय पाऊल पडणार

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांचा विश्वास नवी दिल्ली : इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी चांद्रयान ४,

सियाचीनमध्ये भीषण हिमस्खलन : तीन भारतीय जवान शहीद !

नवी दिल्ली : लडाखमधील सियाचीन बेस कॅम्पवर झालेल्या हिमस्खलनात तीन भारतीय लष्करी जवान शाहिद झाले आहेत . बचाव

Heavy Rains Hit Punjab : पाऊस-पूर-भूस्खलनाची तिहेरी संकटे; भूस्खलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प, २३ गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश,