नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जूनपासून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. हार्दिक पंड्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
या संघाचे नेतृत्व लोकेश राहुलकडे सोपविण्यात आले आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या संघात परतला आहे. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांना टीम इंडियाच्या टी-२० संघात पहिल्यांदाच संधी मिळाली असून विराट, रोहित, बुमरासारखे दिग्गज खेळाडू विश्रांतीवर असतील.
लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक अशा संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. ९ जूनपासून या मालिकेला सुरुवात होईल.
मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…
मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…
मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…
नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…
दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…
आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…