काशीद बीचवर उत्साहाला उधाण

संतोष रांजणकर


मुरुड : पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध अशा काशीद बीचवर मे महिन्याच्या तिसऱ्या वीकेंडलाही रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. रणरणत्या उन्हातही पर्यटकांनी समुद्रात पोहोण्याचा मनसोक्त आनंद लुटला.


काशिदचा समुद्र किनारा हा भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, उसळणाऱ्या मोठाल्या लाटा, किनाऱ्यावरील शुभ्र वाळू यामुळे पर्यटकांना आकर्षित करतो. पर्यटकांच्या सोयी-सुविधांसाठी याठिकाणी असलेली स्पीडबोट, पँरासेलिंगबोट, बनाना, बंफर राईड तसेच घोडा-उंटावरील सफर या गोष्टी पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करतात. या सगळ्याचा पर्यटक मनसोक्त आनंद लुटताना दिसत होते. या ठिकाणी विविध खाद्य-पेय चहा-नाष्टा यांची सोय उपलब्ध आहेत. याठिकाणी दर शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात.


रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी ट्राफिक जॅमलाही सामोरे जावे लागते. देश-विदेशातील पर्यटक येथे आवर्जून भेट देत असतात. त्यामुळे काशिद बीचला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मे महिना असला तरी रविवारी सकाळच्या वेळी ढगाळ वातावरण व नंतर दुपारी प्रचंड उकाडा यामुळे पर्यटकांनी काशिदच्या समुद्रात पोहोण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत.