Categories: पालघर

तवा येथे खाद्यतेल पळविण्यासाठी झुंबड

Share
  • तेलाचा टँकर उलटला
  • महामार्गांवर अपघाताचे सत्र सुरूच

कासा (वार्ताहर) : बई-अहमदाबाद महामार्गांवर शनिवारी सकाळी ६.३० वाजता गुजरातहून मुंबईकडे जाणारा भरधाव टँकर तवा येथील हॉटेल हिमाचल पंजाबसमोर पलटी झाला. यात टँकरचालक गंभीर जखमी झाला असून त्याला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

भरधाव खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर मुंबई वाहिनीवर तिसऱ्या लेनवर पलटी झाला. यावेळी टँकरमधून खाद्यतेलाची मोठी गळती सुरू झाली. टँकरमधील तेल हे खाद्यतेल आहे समजताच आजूबाजूच्या अनेक नागरिकांची खाद्यतेल पळविण्यासाठी मोठी झुंबड उडाली. नागरिकांनी कोणी प्लास्टिक ड्रम, हंडे, बाटल्या जे साहित्य हाती लागेल त्यात सांडलेले खाद्यतेल भरून घरी नेऊ लागले. महामार्गाच्या तिसऱ्या लेनच्या बाजूस अपघात झाला. मात्र बाजूस सेवा रस्ता आहे त्यामुळे जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी झाली नाही. घटनेची माहिती कळताच महामार्ग पोलीस व कासा पोलिसांनी परिस्थिती हाताळली आणि वाहतूक कोंडी सोडविली.

टँकर पलटी झाल्याचे कळताच तेलाची गळती सुरू झाली, ते घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. हा प्रसंग पाहून पुन्हा १९९२ साली मेंढवण येथील अपघाताची आठवण झाली. त्यावेळी झालेल्या अपघातग्रस्त टँकरमध्ये ज्वलंनशील असणारे तेल पळविण्यासाठी अशीच मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी टँकरला आग लागून स्फोट होऊन १०० च्या वर नागरिक जळून खाक झाले होते. अनेक जखमी झाले होते. यामुळे महामार्गावर तशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

57 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago