१५ ते १७ वर्षे वयोगटातील केवळ ६० टक्के लसीकरण

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई कोरोनामुक्त व्हावी यासाठी पालिकेने १६ मार्च २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात केली. त्यानंतर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांच्याही लसीकरणाला सुरवात केली. दरम्यान आतापर्यंत १५ ते १७ वर्षे वयोगटातील लसीकरण केवळ ६० टक्केच मुलांचे झाले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. लहान मुलांच्या म्हणजे १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणालाही कमी प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती दिली आहे.


मुंबई कोरोनामुक्त व्हावी यासाठी पालिकेने लसीकरण मोहीम वेगाने सुरू केली, त्यानंतर समाजातील सगळ्याच वंचित घटकांचे देखील लसीकरण केले. घराघरात जाऊन पालिकेने लसीकरण केले आहे. यामुळेच मुंबईत १८ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे. त्यानंतर पुन्हा पालिकेने बूस्टर डोस, फ्रंटलाईन वर्कर यांच्या लसीकरणावर भर दिला.


दरम्यान केंद्राने सूचना दिल्यानंतर पालिकेने लहान मुले आणि १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले. मात्र त्या लसीकरणाला पुरेसा प्रतिसाद मिळत नसून १५ ते १७ वर्षे वयोगतील केवळ ६० टक्के मुलांचे लसीकरण झाले आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला आहे.


दरम्यान शाळांना सुट्टी किंवा परीक्षा यामुळे लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. दरम्यान लहान मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिका विविध लोकवस्त्यांमध्ये जाऊन शिबिरांद्वारे लसीकरण करणार आहे.


मुंबईत १९८ नवे रुग्ण


मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत असला तरी गेल्या दोन-तीन दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी मुंबईत १९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी २१३ आणि गुरुवारी २२३ एवढी दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या होती. दरम्यान शनिवारी बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या १३९ आहे तर मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या १२११ एवढी झाली आहे. विशेष म्हणजे मुंबईत रुग्ण दुप्पटीचे दिवस कमी होत असून ४४३३ दिवस झाले आहेत.

Comments
Add Comment

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली