जनावरांचा चारा महागला; पशुपालकांसमोर आर्थिक अडचण

  204


  • दूध व्यावसायिकांवर परिणामगवताच्या

  • लागवडीसाठी अल्पभूधारकांची कोंडी


पारस सहाणे


जव्हार : केंद्र सरकार व राज्य सरकारचे महागाईवर नियंत्रण नसल्याने सर्वसामान्य भरडले आहेतच, परंतु याचा फटका पशुपालकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. सर्वत्र महागाईचा डोंब उसळला असल्याने पशुखाद्य व चाराही महागल्यामुळे पशुपालक कास्तकार, तसेच दुग्ध व्यावसायिकांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.


गाय, बैल, म्हशी या शेतीवर राबणाऱ्या तसेच दूध देणाऱ्या पशूंना आरोग्यदायी व सुदृढ ठेवण्याकरिता हिरव्या चाऱ्यासह सरकी, तुरीचा कोंडा, गव्हाचा भुसा आदी पौष्टिक वस्तू खायला देणे आवश्यक आहे. दुभत्या जनावरांना ते नित्य द्यावेच लागते. तरच दूध अधिक मिळते.


पशुखाद्यांचा भाव गेले दोन वर्षांपासून वाढले आहेत. पूर्वी एक ढेप २० रुपये किलो मिळायची. ती आता ३५ रुपये झाली आहे. तुरीचा कोंडा ९ रुपयांवरून २१ रुपये एवढा वधारला. गहू भुशाचा भावही वाढला. परंपरागत गवत महागले आहे.


गवताच्या लागवडीकरिता जमीनही भरपूर हवी. मोठ्या प्रमाणात शेतजमीन असणाऱ्यांना गजराज गवताची लागवड करणे परवडते. अल्पभूधारकाची मात्र अडचण होते. सरकी व तत्सम पशुखाद्याचे भाव दिवसेंदिवस सारखे असल्यामुळे हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र इतर पौष्टिक खाद्य विकत घ्यावेच लागते. या साऱ्या कारणांमुळे दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन कास्तकार यांचे आर्थिक बजेट बिघडत जात आहे. त्याचा परिणाम येणाऱ्या कमाईवर पडत आहे.
- रियाज शेख, दुग्ध व्यावसायिक, पोषेरा


निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेती तोट्यात आहे. दुग्धव्यवसाय कसा तरी तग धरून आहे. त्यात आता पशुखाद्य व संबंधित वस्तूंचे भाव भरमसाट वाढल्याने हा व्यवसायही अडचणीचा ठरत चालला आहे.
- आकाश शिरसाट, दुग्ध व्यावसायिक,जव्हार

Comments
Add Comment

नुकसानग्रस्तांसाठी मिळाला पाऊणे दोन कोंटीचा निधी

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश पालघर : अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील घरे, शेती, फळशेती, मत्स्य

युवक ठरला नियोजनशून्य व्यवस्थेचा बळी!

दुसऱ्याची चूक जयेशच्या जीवावर बेतली विरार: विजेच्या धक्क्याने अर्नाळा येथे मृत्यू झालेल्या जयेश घरत हा केवळ

५० लाख बांबू वृक्ष लागवडीचा शुभारंभ

भातशेतीपेक्षा बांबूशेती करण्याचे आवाहन पालघर : संपूर्ण विश्वभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना दुर्गम

घरकुलासाठी ९१,९९१ कुटुंबाचे सर्वेक्षण !

१८ जूनपर्यंत आणखी मुदतवाढ; नागरिकांना मिळणार हक्काचे घर पालघर : "सर्वांसाठी घरे" शासनाच्या या धोरणाची यशस्वी

वसईतील पारंपरिक व्यवसाय संकटात!

वसई : वसईचा परिसर हा पारंपरिक व्यवसायात अग्रेसर असा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांनी

'शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये'

पालघर :भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पुढील एक