जनावरांचा चारा महागला; पशुपालकांसमोर आर्थिक अडचण


  • दूध व्यावसायिकांवर परिणामगवताच्या

  • लागवडीसाठी अल्पभूधारकांची कोंडी


पारस सहाणे


जव्हार : केंद्र सरकार व राज्य सरकारचे महागाईवर नियंत्रण नसल्याने सर्वसामान्य भरडले आहेतच, परंतु याचा फटका पशुपालकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. सर्वत्र महागाईचा डोंब उसळला असल्याने पशुखाद्य व चाराही महागल्यामुळे पशुपालक कास्तकार, तसेच दुग्ध व्यावसायिकांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.


गाय, बैल, म्हशी या शेतीवर राबणाऱ्या तसेच दूध देणाऱ्या पशूंना आरोग्यदायी व सुदृढ ठेवण्याकरिता हिरव्या चाऱ्यासह सरकी, तुरीचा कोंडा, गव्हाचा भुसा आदी पौष्टिक वस्तू खायला देणे आवश्यक आहे. दुभत्या जनावरांना ते नित्य द्यावेच लागते. तरच दूध अधिक मिळते.


पशुखाद्यांचा भाव गेले दोन वर्षांपासून वाढले आहेत. पूर्वी एक ढेप २० रुपये किलो मिळायची. ती आता ३५ रुपये झाली आहे. तुरीचा कोंडा ९ रुपयांवरून २१ रुपये एवढा वधारला. गहू भुशाचा भावही वाढला. परंपरागत गवत महागले आहे.


गवताच्या लागवडीकरिता जमीनही भरपूर हवी. मोठ्या प्रमाणात शेतजमीन असणाऱ्यांना गजराज गवताची लागवड करणे परवडते. अल्पभूधारकाची मात्र अडचण होते. सरकी व तत्सम पशुखाद्याचे भाव दिवसेंदिवस सारखे असल्यामुळे हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र इतर पौष्टिक खाद्य विकत घ्यावेच लागते. या साऱ्या कारणांमुळे दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन कास्तकार यांचे आर्थिक बजेट बिघडत जात आहे. त्याचा परिणाम येणाऱ्या कमाईवर पडत आहे.
- रियाज शेख, दुग्ध व्यावसायिक, पोषेरा


निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेती तोट्यात आहे. दुग्धव्यवसाय कसा तरी तग धरून आहे. त्यात आता पशुखाद्य व संबंधित वस्तूंचे भाव भरमसाट वाढल्याने हा व्यवसायही अडचणीचा ठरत चालला आहे.
- आकाश शिरसाट, दुग्ध व्यावसायिक,जव्हार

Comments
Add Comment

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता