जनावरांचा चारा महागला; पशुपालकांसमोर आर्थिक अडचण


  • दूध व्यावसायिकांवर परिणामगवताच्या

  • लागवडीसाठी अल्पभूधारकांची कोंडी


पारस सहाणे


जव्हार : केंद्र सरकार व राज्य सरकारचे महागाईवर नियंत्रण नसल्याने सर्वसामान्य भरडले आहेतच, परंतु याचा फटका पशुपालकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. सर्वत्र महागाईचा डोंब उसळला असल्याने पशुखाद्य व चाराही महागल्यामुळे पशुपालक कास्तकार, तसेच दुग्ध व्यावसायिकांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.


गाय, बैल, म्हशी या शेतीवर राबणाऱ्या तसेच दूध देणाऱ्या पशूंना आरोग्यदायी व सुदृढ ठेवण्याकरिता हिरव्या चाऱ्यासह सरकी, तुरीचा कोंडा, गव्हाचा भुसा आदी पौष्टिक वस्तू खायला देणे आवश्यक आहे. दुभत्या जनावरांना ते नित्य द्यावेच लागते. तरच दूध अधिक मिळते.


पशुखाद्यांचा भाव गेले दोन वर्षांपासून वाढले आहेत. पूर्वी एक ढेप २० रुपये किलो मिळायची. ती आता ३५ रुपये झाली आहे. तुरीचा कोंडा ९ रुपयांवरून २१ रुपये एवढा वधारला. गहू भुशाचा भावही वाढला. परंपरागत गवत महागले आहे.


गवताच्या लागवडीकरिता जमीनही भरपूर हवी. मोठ्या प्रमाणात शेतजमीन असणाऱ्यांना गजराज गवताची लागवड करणे परवडते. अल्पभूधारकाची मात्र अडचण होते. सरकी व तत्सम पशुखाद्याचे भाव दिवसेंदिवस सारखे असल्यामुळे हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र इतर पौष्टिक खाद्य विकत घ्यावेच लागते. या साऱ्या कारणांमुळे दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन कास्तकार यांचे आर्थिक बजेट बिघडत जात आहे. त्याचा परिणाम येणाऱ्या कमाईवर पडत आहे.
- रियाज शेख, दुग्ध व्यावसायिक, पोषेरा


निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेती तोट्यात आहे. दुग्धव्यवसाय कसा तरी तग धरून आहे. त्यात आता पशुखाद्य व संबंधित वस्तूंचे भाव भरमसाट वाढल्याने हा व्यवसायही अडचणीचा ठरत चालला आहे.
- आकाश शिरसाट, दुग्ध व्यावसायिक,जव्हार

Comments
Add Comment

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या

अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा

पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या

कोट्यवधींचा शिक्षण कर वसूल; शाळा हस्तांतरण मात्र रखडलेलेच

महापालिकेत शिक्षण समिती व सभापती नसण्याची परंपरा कायम राहणार गणेश पाटील विरार : महापालिकेची स्थापना होऊन १६

मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना

महापौरांना ७५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता

उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजार विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना

वसई-विरार महापालिकेत महापौर पदासाठी ७ अर्ज

उपमहापौर पदासाठी ५ अर्ज विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल