जनावरांचा चारा महागला; पशुपालकांसमोर आर्थिक अडचण

  215


  • दूध व्यावसायिकांवर परिणामगवताच्या

  • लागवडीसाठी अल्पभूधारकांची कोंडी


पारस सहाणे


जव्हार : केंद्र सरकार व राज्य सरकारचे महागाईवर नियंत्रण नसल्याने सर्वसामान्य भरडले आहेतच, परंतु याचा फटका पशुपालकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. सर्वत्र महागाईचा डोंब उसळला असल्याने पशुखाद्य व चाराही महागल्यामुळे पशुपालक कास्तकार, तसेच दुग्ध व्यावसायिकांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.


गाय, बैल, म्हशी या शेतीवर राबणाऱ्या तसेच दूध देणाऱ्या पशूंना आरोग्यदायी व सुदृढ ठेवण्याकरिता हिरव्या चाऱ्यासह सरकी, तुरीचा कोंडा, गव्हाचा भुसा आदी पौष्टिक वस्तू खायला देणे आवश्यक आहे. दुभत्या जनावरांना ते नित्य द्यावेच लागते. तरच दूध अधिक मिळते.


पशुखाद्यांचा भाव गेले दोन वर्षांपासून वाढले आहेत. पूर्वी एक ढेप २० रुपये किलो मिळायची. ती आता ३५ रुपये झाली आहे. तुरीचा कोंडा ९ रुपयांवरून २१ रुपये एवढा वधारला. गहू भुशाचा भावही वाढला. परंपरागत गवत महागले आहे.


गवताच्या लागवडीकरिता जमीनही भरपूर हवी. मोठ्या प्रमाणात शेतजमीन असणाऱ्यांना गजराज गवताची लागवड करणे परवडते. अल्पभूधारकाची मात्र अडचण होते. सरकी व तत्सम पशुखाद्याचे भाव दिवसेंदिवस सारखे असल्यामुळे हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र इतर पौष्टिक खाद्य विकत घ्यावेच लागते. या साऱ्या कारणांमुळे दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन कास्तकार यांचे आर्थिक बजेट बिघडत जात आहे. त्याचा परिणाम येणाऱ्या कमाईवर पडत आहे.
- रियाज शेख, दुग्ध व्यावसायिक, पोषेरा


निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेती तोट्यात आहे. दुग्धव्यवसाय कसा तरी तग धरून आहे. त्यात आता पशुखाद्य व संबंधित वस्तूंचे भाव भरमसाट वाढल्याने हा व्यवसायही अडचणीचा ठरत चालला आहे.
- आकाश शिरसाट, दुग्ध व्यावसायिक,जव्हार

Comments
Add Comment

खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील

जिल्ह्यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात

सहा हजार हेक्टरवर भातपेरणी, जिल्ह्यात ८९ हजार हेक्टरवर होणार भाताची लागवड अलिबाग  : पावसाळ्याला यंदा मे

आणीबाणी काळ म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई !

पालघर: संपूर्ण देशात लोकशाही मजबूत होत असताना २५ जून १९७५ रोजी संविधानाची हत्या करून आणीबाणी लागू केली. या

सूर्या प्रकल्पातून वाढीव पाणी मिळणार नाही

पालघरसह २० गावांना शोधावा लागणार दुसरा पर्याय गणेश पाटील पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्रासह नजीकच्या २० गावांना

मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी एनएचआयला पत्र

व्हाईट टेपिंगच्या निकृष्ट कामामुळे अपघात तलासरी : मुंबई-अहमदाबादबाद महामार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत,

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत?

सफाळे: पालघर जिल्ह्यातील मांडे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-अहमदाबाद अतिजलद (बुलेट ट्रेन) प्रकल्पाचे काम वेगाने