कांदा दरासाठी शेतकऱ्यांचे सोशल मीडियावर अनोखे कमेंट्स आंदोलन

नाशिक (प्रतिनिधी) : कांद्याच्या दरासाठी आता शेतकऱ्यांनी देशातील आणि राज्यातील राज्यकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉमेंट्स आंदोलन शनिवारपासून सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी याबाबत माहिती दिली. या आंदोलनाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.


देशातील सर्वच राजकीय नेते व राजकीय पक्ष सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असतात. फेसबुक पेजेस, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्युब, अशा सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून राजकीय नेत्यांकडून विविध कामांचे भूमिपूजन, उद्घाटन, सभा, दौरे यांचे फोटो, बातम्या, व्हीडिओज सातत्याने पोस्ट केल्या जातात. राज्यात व देशात मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत व नाफेडकडूनही उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होत असून कांद्याचे दर प्रचंड घसरल्याने राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.


महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांनी सांगितले की, कांदा दर घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना असताना राज्यातील नेत्यांचे मात्र सोयीस्कररीत्या कांदा प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेत्यांचे कांदाप्रश्नी लक्ष वेधून घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियावरील व्हीडिओज आणि मेसेजेसजच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या कांद्याला तत्काळ ३० रुपये प्रति किलोचा भाव द्यावा, अशी मागणी करावी आणि वरील मागणी करताना मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषेत कमेंट्स कराव्यात, अशी शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे.


कांदा दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी केलेले हे आगळेवेगळे सोशल मीडियावरील कमेंट्स आंदोलनही मोठे प्रभावी ठरेल. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ