केडीएमसीच्या २७ गावांमधील पाणीटंचाईला जबाबदार कोण?

प्रशांत जोशी


डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात असणाऱ्या त्या २७ गावांत पाणीटंचाई का झाली? पाण्यामुळे त्या पाचजणांचा मृत्यू झाला? खदानीवर आपला अंत होईल, अशी पुसटशी शंका कोणाला आली तरी असती का? त्यामुळे आता सर्व गावांसाठी पाणी द्या, आमचे सांत्वन करण्यासाठी कोणीही येऊ नका, अशी टोकाची विधाने गायकवाड कुटुंबीय करीत आहेत.


बुधवारी केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले यांनाही भेदरलेल्या गायकवाड कुटुंबातील पुरुषांनी खडे बोल सुनावले ते त्यांच्यावर कोसळलेल्या त्या परिस्थितीमुळेच. पण आतातरी राज्यशासन, एमआयडीसी व पालिका प्रशासन या गावातील सामान्यांना पाणी देणार का, अशी विचारणा पंचक्रोशीत होत आहे.


गायकवाड कुटुंबातील ते पाच जीव जाऊन पंधरा दिवसांचा कालावधी होत आहे. सांत्वन करण्यासाठी आमदार, खासदार तसेच विविध पक्षीय नेतमंडळींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ही बाब सामाजिक बांधिलकी जोपासण्यापुरती महत्त्वाची असली तरी आपण या पाण्याच्या मुख्य कारणासाठी काही ठोस कामगिरी केली पाहिजे याची जबाबदारी कोण घेणार यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. अमृत योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासकामांच्या माध्यमातून पाणी मिळेल, असे सांगण्यात येत असले तरी त्यासाठी नक्की किती कालावधी लागणार हेही माहीत नाही. प्रशासनाच्या लाल फितीत अडकलेल्या दफ्तरीवरील धूळ ज्यावेळी झटकली जाईल, त्यानंतरच पाण्याचे चार थेंब त्या २७ गावातील गावकऱ्यांच्या घशाची कोरड थांबेल अशी परिस्थिती सद्यस्थितीत आहे. तोपर्यंत किती माणसे खदानीचे बळी ठरतील ते प्रशासनच जाणे.


पूर्वीपासून या पंचक्रोशीतील गावांना एमआयडीसीकडूनच पाणीपुरवठा केला जात होता. ही २७ गावे महापालिकेतून आत-बाहेर ही साखळी सुरूच आहे. यासाठी सर्वपक्षीय हक्क संघर्ष समिती आंदोलने करत आली आहे, पण त्यातून काही निष्पन्न होत नाही. मुख्य म्हणजे गावागावात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आणि वाढ झाली. त्याप्रमाणात सुविधा मिळाल्या नाहीत.


कल्याण-डोंबिवली महापालिका अंतर्गत शहरी भागात पाणीटंचाई नाही कारण सम पंपयोजना अंतर्गत टाक्या आणि पाइपलाइन यांचे नूतनीकरण करून काही प्रमाणात पाण्याची समस्या शहरी भागात निकाली काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. पण आता २७ गावांमधील पाणीटंचाई पूर्णतः दूर करण्यासाठी प्रशासनाने १९४ कोटी रुपये खर्चाच्या अमृत योजनेचे काम हाती घेतले आहे. सदर योजनेचे काम पूर्ण होण्यास आणखी किमान एक ते दीड वर्ष नक्कीच लागणार हे सत्य आहे. २७ गावांमधील पाणीटंचाईला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे.

Comments
Add Comment

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे