राज्य सरकारने सुडाचे राजकारण बंद करावे

मुंबई (प्रतिनिधी) : महिला पोलीस अधिकारी जखमी प्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात न्यायालयाकडून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर ते शुक्रवारी सर्वांसमोर आले.


संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला माझा धक्का लागल्याचे एकजरी फुटेज मला तुम्ही दाखवले तर मी या क्षणाला राजकारण सोडून देईन, असे संदीप देशपांडे म्हणाले. "एक गोष्ट लक्षात घ्या. आज तुमचे दिवस आहेत. उद्या आमचे असतील. त्यामुळे राज्य सरकारने आधी हे असले सूडाचे राजकारण बंद करावे, असे देशपांडे म्हणाले.


देशपांडे पुढे म्हणाले की, त्या दिवशी जे घडलं ते सर्वांनी पाहिलं आहे. जर त्या पोलीस भगिनी माझ्या किंवा माझ्या कारच्या धक्क्याने पडल्या असतील असं जर फुटेज तुम्ही मला दाखवलंत तर मी राजकारण सोडून देईन. माझा किंवा कार्यकर्त्यांच्या धक्क्याने त्या पडलेल्या नव्हत्या. तरीही माझ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला. आम्ही काय चोर किंवा दहशतवादी आहोत का? आम्हाला पकडण्यासाठी इतका दबाव पोलिसांवर का आणला जात होता?", असा सवाल उपस्थित करत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

Comments
Add Comment

मुंबईकरांनी दिवाळीत फटाक्यांसह केला कचरा, महापालिकेने तब्बल ३,००० टन जमा केला..

मुंबई (खास प्रतिनिधी): दीपावलीच्या पूर्वी करण्यात आलेली साफसफाई आणि या सणाच्या काळात भेटवस्तू तसेच फटाक्यांचा

हवामान खात्याचा महाराष्ट्राला आज आणि उद्यासाठी पावसाचा इशारा

मुंबई : यंदा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अती पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी उभी पिकं वाहून गेली. केंद्र

आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या मोहम्मद सलीम शेखला दुबईतून अटक, मुंबई पोलीस क्राइम ब्रॅंचची मोठी कामगिरी!

मुंबई: मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश

मध्य रेल्वेचा ९ दिवस मेगाब्लॉक! 'या' स्थानकांदरम्यान वाहतूक राहणार बंद, लांबपल्ल्याच्या लोकल ट्रेनला फटका

मुंबई: कर्जत स्थानकाच्या पुनर्रचना कामासाठी मध्य रेल्वेने ९ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक २४

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या