माथेरानच्या राणीच्या फेऱ्यांमध्ये वाढ

रायगड (प्रतिनिधी) : सध्या शाळांना सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्यांचा हंगाम सुरू आहे. यामुळे पर्यटन स्थळांवर गर्दी आहे. मुंबईपासून जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना करावी लागणारी कसरत आणि लूट आता थांबणार आहे. माथेरानच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद जास्तीत जास्त पर्यटकांना घेता येणार आहे. खासकरून लहान मुलांमध्ये माथेरानच्या राणीची क्रेझ आहे. माथेरानच्या राणीच्या फेऱ्यांमध्ये शुक्रवारपासूनपासून अप १० आणि डाऊन १० अशा एकूण २० फेऱ्या होणार आहेत. यापूर्वी एकूण अप आणि डाऊन मिळून १६ फेऱ्या चालविल्या जात होत्या.


माथेरान ते अमन लॉज अशा या एकूण २० फेऱ्या होणार आहेत. सोमवार ते शनिवार दरम्यान या २० फेऱ्या होतील. २० मे ते ३१ मे पर्यंत म्हणजे फक्त उन्हाळी सुट्ट्यांसाठी ही सेवा राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पर्यटकांच्या दळणवळणासाठी नेरळ-माथेरान मार्गावर परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय माथेरान नगरपरिषदेने घेतला आहे. नगरपरिषदेच्या परिवहन सेवेसाठी एसटी महामंडळाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्याने एक पाऊल पुढे पडले आहे.


एसटीच्या केवळ दोन फेऱ्या धावत असल्याने रोजगारासाठी तसेच शाळा-महाविद्यालयासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक विद्यार्थ्यांना शाळेसाठी रोजचा टॅक्सीखर्च परवडत नसल्याने कुटुंबे माथेरान सोडून कर्जत तसेच नेरळ येथे स्थायिक होत आहेत. यामुळे माथेरानची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. स्थानिकांना परवडणाऱ्या दरात आणि आरामदायी सेवा मिळावी यासाठी माथेरान परिवहन सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.


पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा मिळणार


कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर सेवा आणि आदरातिथ्य क्षेत्राच्या वाढीसाठी मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील पाच पर्यटनस्थळांवर पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी उद्योजकांबरोबर करार करण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी दिली.


महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनींचा खासगीकरणाच्या माध्यमातून पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या अंतर्गत महाबळेश्वर, माथेरान, मीठबाव, हरिहरेश्वर आणि ताडोबा येथे निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी विकासकांना सवलतीचे करारपत्र देण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी

१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या

अलिबाग पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-शेकाप लढत

१४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात अलिबाग : अलिबाग पंचायत समिती निवडणुकीसाठी १४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत.

राजिप, पंचायत समित्या निवडणुकीच्या तोंडावर पोलीस यंत्रणा सज्ज

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने

करंजाडी जिप गटात तिरंगी लढत

महाड ( वार्ताहर): महाड विधानसभा मतदारसंघ हा गेल्या ४ टर्म शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे. गतवेळच्या निवडणुकीत