पुढील २५ वर्षांचे लक्ष्य ठरवण्याची हीच ती वेळ

जयपूर : "स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात देश पुढच्या २५ वर्षांचे लक्ष्य ठरवत आहेत. भाजपाचीही पुढच्या २५ वर्षांचे लक्ष्य ठरवण्याची हीच ती वेळ आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास' हाच आपला मंत्र आहे. देशातल्या लोकांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहे. देशासमोर जी आव्हाने आहेत, ती देशातल्या जनतेसोबत राहून आपल्याला परतवून लावायची आहेत," असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना केले.


जयपूरमध्ये गुरुवारपासून भाजपाची तीन दिवसीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हजेरी लावली.


जगाच्या भारताकडून खूप अपेक्षा आहेत. तसेच देशातही भाजपाबद्दल लोकांच्या मनात विशेष प्रेमाची भावना आहे. देशातली जनता भाजपाकडे विश्वासाने, अपेक्षेने पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्याला देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.


या बैठकीत यावर्षी गुजरात, हिमाचलमध्ये होणाऱ्या तसेच पुढच्या वर्षी अनेक राज्यात होणाऱ्या निवडणुका आणि २०२४ मधल्या लोकसभा निवडणुकांबद्दलची चर्चा होणार आहे. देशाच्या जनतेच्या आशा-आकांक्षांमुळे आपले दायित्व अधिक वाढले असल्याची भावनाही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या