पुढील २५ वर्षांचे लक्ष्य ठरवण्याची हीच ती वेळ

  90

जयपूर : "स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात देश पुढच्या २५ वर्षांचे लक्ष्य ठरवत आहेत. भाजपाचीही पुढच्या २५ वर्षांचे लक्ष्य ठरवण्याची हीच ती वेळ आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास' हाच आपला मंत्र आहे. देशातल्या लोकांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहे. देशासमोर जी आव्हाने आहेत, ती देशातल्या जनतेसोबत राहून आपल्याला परतवून लावायची आहेत," असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना केले.


जयपूरमध्ये गुरुवारपासून भाजपाची तीन दिवसीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हजेरी लावली.


जगाच्या भारताकडून खूप अपेक्षा आहेत. तसेच देशातही भाजपाबद्दल लोकांच्या मनात विशेष प्रेमाची भावना आहे. देशातली जनता भाजपाकडे विश्वासाने, अपेक्षेने पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्याला देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.


या बैठकीत यावर्षी गुजरात, हिमाचलमध्ये होणाऱ्या तसेच पुढच्या वर्षी अनेक राज्यात होणाऱ्या निवडणुका आणि २०२४ मधल्या लोकसभा निवडणुकांबद्दलची चर्चा होणार आहे. देशाच्या जनतेच्या आशा-आकांक्षांमुळे आपले दायित्व अधिक वाढले असल्याची भावनाही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या आणले, आर्मेनियाच्या रस्त्याने दिल्लीला पोहोचले

नवी दिल्ली: इराणमध्ये अडकलेले ११० भारतीय विद्यार्थी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले

केदारनाथच्या मार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू

रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये केदारनाथ धामला जाणाऱ्या ट्रेक मार्गावर भूस्खलन झाले. भूस्खलन

भारतीय अंतराळवीर २२ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने रवाना होणार

नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अ‍ॅक्सिओम-४ मिशन

देशभरात ६८३६ कोरोनाचे रुग्ण सक्रिय

नवी दिल्ली : देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या ६८३६ वर आली आहे. गेल्या ६ दिवसांत सक्रिय रुग्णांमध्ये २८५ ने घट

Gangster Couple: ऐकावं ते नवलच! गँगस्टर काला जठेडी तुरुंगात राहून बनणार बाबा, आयव्हीएफ ट्रीटमेंटद्वारे बाळ जन्माला घालणार

गेल्यावर्षी अनुराधा चौधरी उर्फ 'रिव्हॉल्व्हर राणी'  सोबत केले लग्न,  आता हे गँगस्टर दाम्पत्य दूर राहून वंश

भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे, भारतीय दूतावासाचे आवाहन

भारतीय दूतावासाने केले आपल्या नागरिकांना आवाहन नवी दिल्ली : इराणच्या तेहरान शहरावर होणाऱ्या हवाई हल्ल्याच्या