बेस्ट आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या भविष्य निवार्ह निधीत २०० कोटी रुपयांचा घोटाळा

  123

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांच्या कष्टाची कमाई मुंबई महापालिका प्रशासनातील काही अधिकारी व कंत्राटदार लुटण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी केला आहे. गोरगरीब मुंबईकरांच्या कष्टाचे २०० कोटी महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेने टक्केवारीसाठी कंत्राटदारांच्या घश्यात घातले. महाराष्ट्राच्या जनतेचा अंत पाहू नका, असे ट्विट करत योगेश सागर यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.


https://twitter.com/Yogeshsagar09/status/1527556222018150400

महानगरपालिका प्रशासनाकडून कामगारांच्या आयुष्याशी व त्यांच्या भविष्याशी खेळ सुरु असून खासगी कंत्राटदारांना हाताशी धरुन पालिका प्रशासन बेस्ट कर्मचाऱ्यांचा थेट भविष्य निवाह निधी हडप करत असल्याचेही योगेश सागर यांचे म्हणणे आहे. योगेश सागर यांनी यासंदर्भात केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे तक्रार करत पत्र दिले आहे.


कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीत तब्बल १९० कोटी रुपयाचा घोटाळा झाला आहे. तर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा जवळपास साडेसहा कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. विशेष म्हणजे यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त गंभीर नाहीत. तसेच राज्य सरकार याबाबत गांभीर्याने विचार करीत नाही. यामुळे या घोटाळ्याकडे लक्ष वेधत आपण याची दखल घेत चौकशी करावी, अशी मागणी आमदार सागर यांनी पत्राद्वारे केली आहे.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र