कोरोनानंतर मंत्रालयात पहिल्या दिवशी २ हजार ६०० अभ्यागत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कोरोनाचे सर्व निर्बंध उठवल्यानंतर बुधवारपासून सर्वसामान्य जनतेसाठी मंत्रालयाचे दरवाजे खुले झाले. मात्र बुधवार असूनही केवळ २ हजार ६०० अभ्यागतांनी मंत्रालयात प्रवेश केल्याचे कळते. दुपारी दोननंतर सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश देणार आला. यासाठी प्रवेश पत्रिका देण्यासाठी सुमारे १० खिडक्यांची सोय करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर बुधवारपासून सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश देण्यात आला.


निर्बंधापूर्वी बुधवारी हजारोच्या संख्येने लोक मंत्रालयात आपली गाऱ्हाणी घेऊन यायचे. परंतु कोरोनानंतर मात्र, मंत्रालयाचे दरवाजे खुले झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बुधवारी लोकांकडून तसा उत्साह दिसून आला नाही. ज्येष्ठ नागरिकांना दुपारी १२ वाजल्यानंतर तर सर्वसामान्य जनतेला दुपारी २ वाजल्यानंतर प्रवेश दिला जात होता. गेल्या दोन वर्षांत मंत्रालयात केवळ अधिकारी आणि बैठकांना उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींनाच मंत्रालयात प्रवेश दिला जात होता. बुधवारपासून सर्वसामान्यांसाठी मंत्रालय खुले करण्यात आल्यामुळे मंत्री आणि सचिव दालनात गर्दी झाल्याचे चित्र होते.


कोरोनाशी मुकाबला करण्याकरीता बंद असलेला सर्वसामान्यांचा मंत्रालय प्रवेश बुधवारी तब्बल दोन वर्षांनंतर सुरू झाला. दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश देण्यात आला. दोन वर्षांपासून अभ्यागतांना प्रवेश बंद होता. प्रवेशाचा पास देण्याच्या ठिकाणी टपाल स्वीकारण्याचे काम केले जात होते. बुधवारपासून पास देण्याच्या या खिडक्यांवर पुन्हा काम सुरू झाले.

Comments
Add Comment

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता