कोरोनानंतर मंत्रालयात पहिल्या दिवशी २ हजार ६०० अभ्यागत

  46

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कोरोनाचे सर्व निर्बंध उठवल्यानंतर बुधवारपासून सर्वसामान्य जनतेसाठी मंत्रालयाचे दरवाजे खुले झाले. मात्र बुधवार असूनही केवळ २ हजार ६०० अभ्यागतांनी मंत्रालयात प्रवेश केल्याचे कळते. दुपारी दोननंतर सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश देणार आला. यासाठी प्रवेश पत्रिका देण्यासाठी सुमारे १० खिडक्यांची सोय करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर बुधवारपासून सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश देण्यात आला.


निर्बंधापूर्वी बुधवारी हजारोच्या संख्येने लोक मंत्रालयात आपली गाऱ्हाणी घेऊन यायचे. परंतु कोरोनानंतर मात्र, मंत्रालयाचे दरवाजे खुले झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बुधवारी लोकांकडून तसा उत्साह दिसून आला नाही. ज्येष्ठ नागरिकांना दुपारी १२ वाजल्यानंतर तर सर्वसामान्य जनतेला दुपारी २ वाजल्यानंतर प्रवेश दिला जात होता. गेल्या दोन वर्षांत मंत्रालयात केवळ अधिकारी आणि बैठकांना उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींनाच मंत्रालयात प्रवेश दिला जात होता. बुधवारपासून सर्वसामान्यांसाठी मंत्रालय खुले करण्यात आल्यामुळे मंत्री आणि सचिव दालनात गर्दी झाल्याचे चित्र होते.


कोरोनाशी मुकाबला करण्याकरीता बंद असलेला सर्वसामान्यांचा मंत्रालय प्रवेश बुधवारी तब्बल दोन वर्षांनंतर सुरू झाला. दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश देण्यात आला. दोन वर्षांपासून अभ्यागतांना प्रवेश बंद होता. प्रवेशाचा पास देण्याच्या ठिकाणी टपाल स्वीकारण्याचे काम केले जात होते. बुधवारपासून पास देण्याच्या या खिडक्यांवर पुन्हा काम सुरू झाले.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही