कोरोनानंतर मंत्रालयात पहिल्या दिवशी २ हजार ६०० अभ्यागत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कोरोनाचे सर्व निर्बंध उठवल्यानंतर बुधवारपासून सर्वसामान्य जनतेसाठी मंत्रालयाचे दरवाजे खुले झाले. मात्र बुधवार असूनही केवळ २ हजार ६०० अभ्यागतांनी मंत्रालयात प्रवेश केल्याचे कळते. दुपारी दोननंतर सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश देणार आला. यासाठी प्रवेश पत्रिका देण्यासाठी सुमारे १० खिडक्यांची सोय करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर बुधवारपासून सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश देण्यात आला.


निर्बंधापूर्वी बुधवारी हजारोच्या संख्येने लोक मंत्रालयात आपली गाऱ्हाणी घेऊन यायचे. परंतु कोरोनानंतर मात्र, मंत्रालयाचे दरवाजे खुले झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बुधवारी लोकांकडून तसा उत्साह दिसून आला नाही. ज्येष्ठ नागरिकांना दुपारी १२ वाजल्यानंतर तर सर्वसामान्य जनतेला दुपारी २ वाजल्यानंतर प्रवेश दिला जात होता. गेल्या दोन वर्षांत मंत्रालयात केवळ अधिकारी आणि बैठकांना उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींनाच मंत्रालयात प्रवेश दिला जात होता. बुधवारपासून सर्वसामान्यांसाठी मंत्रालय खुले करण्यात आल्यामुळे मंत्री आणि सचिव दालनात गर्दी झाल्याचे चित्र होते.


कोरोनाशी मुकाबला करण्याकरीता बंद असलेला सर्वसामान्यांचा मंत्रालय प्रवेश बुधवारी तब्बल दोन वर्षांनंतर सुरू झाला. दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश देण्यात आला. दोन वर्षांपासून अभ्यागतांना प्रवेश बंद होता. प्रवेशाचा पास देण्याच्या ठिकाणी टपाल स्वीकारण्याचे काम केले जात होते. बुधवारपासून पास देण्याच्या या खिडक्यांवर पुन्हा काम सुरू झाले.

Comments
Add Comment

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

आज-उद्या-परवा समुद्रकिनाऱ्यावर काळजी घ्या!

४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती मुंबई : मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका कारण्यासाठी जाणारे

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

‘राजगृह’सह चैत्यभूमीवर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण

Railway News : मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आता 'ओटीपी' बंधनकारक; रेल्वेचा नवीन नियम काय?

मुंबई : रेल्वे प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये सुरक्षितता आणि पारदर्शकता मिळावी, यासाठी भारतीय रेल्वेने एक