टीईटी न देणाऱ्या पालिका शाळांतील १३० शिक्षक बडतर्फ

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिका शाळांमध्ये सेवेत असलेल्या १३० शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पूर्ण केली नाही म्हणून बडतर्फ करण्यात आले आहे. या शिक्षकांना मार्च २०१९ ही अखेरची मुदत देण्यात आली होती. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने उन्हाळी सुटी सुरू झाल्यानंतर १ मे रोजी या शिक्षकांना बडतर्फीचे आदेश दिले आहेत.


त्यामुळे हे शिक्षक दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार २०१३ नंतर झालेल्या शिक्षक नियुक्तीवेळी ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ उत्तीर्ण नसणाऱ्यांना मार्च २०१९ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यांनी या कालावधीत ही परीक्षा उत्तीर्ण न केल्याने अखेर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. याबाबत त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्याचेही पालिका शिक्षण अधिकारी राजे कंकाळ यांनी सांगितले.


केंद्राने २०१०मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा लागू केली. राज्यात त्याची अंमलबजावणी २०१३ पासून करण्यात आली. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मार्च २०१९ची अंतिम मूदत देण्यात आली होती. मात्र ज्या राज्यांमध्ये २०१०पासून शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची करण्यात आली, तेथे त्यांना नऊ वर्षांचा कालावधी मिळाला.

Comments
Add Comment

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण

वांद्र्यांतील रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यालयावर फेब्रुवारीत हातोडा

पुनर्विकासातून ८ हजार कोटींचा महसूल अपेक्षित मुंबई : वांद्रे रेक्लेमेशन येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

उमेदवारांना अनावश्यक 'एनओसी'ची सक्ती का?

जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी मुंबई : गरज नसतानाही निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबईतील काही ठिकाणी मतदान केंद्रांत बदल

राजकीय पक्षांसह उमेदवारांना माहिती देण्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश मुंबई : मुंबई

महापालिकेच्या शाळांमध्ये गळती कुठे, उबाठाला दिसते कुठे?

वाह रे वाह... पटसंख्या वाढवण्यासाठी दहावीनंतर बारावीपर्यंतचे कॉलेज सुरू करणार म्हणे उबाठा- मनसेचा वचननामा, आमचा