टीईटी न देणाऱ्या पालिका शाळांतील १३० शिक्षक बडतर्फ

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिका शाळांमध्ये सेवेत असलेल्या १३० शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पूर्ण केली नाही म्हणून बडतर्फ करण्यात आले आहे. या शिक्षकांना मार्च २०१९ ही अखेरची मुदत देण्यात आली होती. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने उन्हाळी सुटी सुरू झाल्यानंतर १ मे रोजी या शिक्षकांना बडतर्फीचे आदेश दिले आहेत.


त्यामुळे हे शिक्षक दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार २०१३ नंतर झालेल्या शिक्षक नियुक्तीवेळी ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ उत्तीर्ण नसणाऱ्यांना मार्च २०१९ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यांनी या कालावधीत ही परीक्षा उत्तीर्ण न केल्याने अखेर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. याबाबत त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्याचेही पालिका शिक्षण अधिकारी राजे कंकाळ यांनी सांगितले.


केंद्राने २०१०मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा लागू केली. राज्यात त्याची अंमलबजावणी २०१३ पासून करण्यात आली. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मार्च २०१९ची अंतिम मूदत देण्यात आली होती. मात्र ज्या राज्यांमध्ये २०१०पासून शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची करण्यात आली, तेथे त्यांना नऊ वर्षांचा कालावधी मिळाला.

Comments
Add Comment

डोंबिवलीतील अनमोल म्हात्रे, महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई : डोंबिवलीतील राजकीय घडामोडींमध्ये मोठा बदल झाला आहे. माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल

बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला भीषण आग !

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ आणि इतर रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनावर घर करणाऱ्या अभिनेता शिव ठाकरेच्या मुंबईतील

महापालिकेच्या मालमत्ता विभागांमध्ये वर्षांनुवर्षे अधिकारी एकाच जागेवर, विकासकांची साठेलोटे असल्याचा बीआयटी चाळीतील भाडेकरुंचा आरोप

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागात मागील १६ वर्षांपासून अधिकारी कार्यरत असून यातील

दादर पश्चिमेची वाहतूक कोंडी सुटणार

जे. के. सावंत मार्ग जोडणारा येलवे रस्ता सेनापती बापट मार्गाला जोडणार मुंबई : एलफिन्स्टन पूल बंद करण्यात आल्याने

मुंबईत आधीपासूनच ८ ठिकाणी भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण

मुलुंडमध्ये विरोध झाल्याने महापालिका अधिकारी झाले अवाक् मुंबई : महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईत एकूण ८

भरती परीक्षेच्या निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या