मुंबईकरांना पाण्याचे ‘नो टेन्शन’

सीमा दाते


मुंबई : सध्या वाढती उष्णता आणि मे महिना असल्याने मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याची चिंता आहे. मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये २१.९९ टक्के इतका पाणी साठा शिल्लका आहे. हा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना पाणीटंचाईची भीती नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


सध्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे अनेक ग्रामीण भागात पाण्याची अडचणी निर्माण झाली आहे. त्यातच जमा असलेल्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवन होत असते. यामुळे मुंबईतही पाणीटंचाई होईल की काय, अशी भीती होती. मात्र आतापर्यंत मुंबईकरांना पाणीटंचाईची चिंता करण्याची गरज नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सातही तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात अनेकदा पाणीसाठा कमी शिल्लक राहिल्याने मुंबईत १० ते १५ टक्के पाणीकपात होते. मात्र या वर्षी कपातीची गरज भासणार नाही, असे दिसत आहे.




 

भातसा तलावात १ लाख ६१ हजार ९०० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. मध्य वैतरणा तलावातही सुमारे ८२ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मोडक सागर तलावात ४३ हजार, तर तानसामध्ये २२ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक असल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून सांगण्यात आले.


 

मुंबई शहराला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे महिना सरासरी १ लाख १५ हजार ते १ लाख १९ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासते. तलावातील पाण्याचा साठा लक्षात घेता, हे पाणी जुलै मध्यापर्यंत पुरेल इतके आहे.

Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील