मुंबईकरांना पाण्याचे ‘नो टेन्शन’

  55

सीमा दाते


मुंबई : सध्या वाढती उष्णता आणि मे महिना असल्याने मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याची चिंता आहे. मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये २१.९९ टक्के इतका पाणी साठा शिल्लका आहे. हा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना पाणीटंचाईची भीती नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


सध्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे अनेक ग्रामीण भागात पाण्याची अडचणी निर्माण झाली आहे. त्यातच जमा असलेल्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवन होत असते. यामुळे मुंबईतही पाणीटंचाई होईल की काय, अशी भीती होती. मात्र आतापर्यंत मुंबईकरांना पाणीटंचाईची चिंता करण्याची गरज नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सातही तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात अनेकदा पाणीसाठा कमी शिल्लक राहिल्याने मुंबईत १० ते १५ टक्के पाणीकपात होते. मात्र या वर्षी कपातीची गरज भासणार नाही, असे दिसत आहे.




 

भातसा तलावात १ लाख ६१ हजार ९०० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. मध्य वैतरणा तलावातही सुमारे ८२ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मोडक सागर तलावात ४३ हजार, तर तानसामध्ये २२ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक असल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून सांगण्यात आले.


 

मुंबई शहराला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे महिना सरासरी १ लाख १५ हजार ते १ लाख १९ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासते. तलावातील पाण्याचा साठा लक्षात घेता, हे पाणी जुलै मध्यापर्यंत पुरेल इतके आहे.

Comments
Add Comment

जरांगेंच्या आंदोलनाचं काय होणार ? तोडगा निघणार की... ?

मुंबई : ओबीसी कोट्यातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत मनोज जरांगेंच्या नेतृत्वात त्यांचे

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, ओबीसी नेत्यांसोबत आज घेणार महत्वपूर्ण निर्णय

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारचे

Maratha Reservation : मराठा आरक्षण मुद्यावर मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर खलबत! मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कडक आमरण उपोषणाला बसणार

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादाच्या भोवऱ्यात! जनसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप

मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या

आता आणखी किती दिवस?' ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.