मुंबईकरांना पाण्याचे ‘नो टेन्शन’

सीमा दाते


मुंबई : सध्या वाढती उष्णता आणि मे महिना असल्याने मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याची चिंता आहे. मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये २१.९९ टक्के इतका पाणी साठा शिल्लका आहे. हा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना पाणीटंचाईची भीती नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


सध्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे अनेक ग्रामीण भागात पाण्याची अडचणी निर्माण झाली आहे. त्यातच जमा असलेल्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवन होत असते. यामुळे मुंबईतही पाणीटंचाई होईल की काय, अशी भीती होती. मात्र आतापर्यंत मुंबईकरांना पाणीटंचाईची चिंता करण्याची गरज नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सातही तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात अनेकदा पाणीसाठा कमी शिल्लक राहिल्याने मुंबईत १० ते १५ टक्के पाणीकपात होते. मात्र या वर्षी कपातीची गरज भासणार नाही, असे दिसत आहे.




 

भातसा तलावात १ लाख ६१ हजार ९०० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. मध्य वैतरणा तलावातही सुमारे ८२ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मोडक सागर तलावात ४३ हजार, तर तानसामध्ये २२ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक असल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून सांगण्यात आले.


 

मुंबई शहराला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे महिना सरासरी १ लाख १५ हजार ते १ लाख १९ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासते. तलावातील पाण्याचा साठा लक्षात घेता, हे पाणी जुलै मध्यापर्यंत पुरेल इतके आहे.

Comments
Add Comment

राणीबागेत चला बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन पहायला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूतावास यांच्या

मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभागनिहाय अंतिम आरक्षण

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला),

Rajesh Aggarwal : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव, चार अधिकाऱ्यांची संधी हुकली

मुंबई : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सोमवार १ डिसेंबर २०२५ पासून पदभार स्वीकारणार आहेत.

महाराष्ट्रातील ७५ गावं स्मार्ट होणार; गावात सीसीटीव्ही, वाय-फाय, डिजिटल शिक्षण व्यवस्था उपलब्ध होणार

मुंबई : महाराष्ट्रातील गावांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची गंगा पोहोचावी यासाठी राज्य सरकार अभिनव उपक्रम राबवत

एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत होणार

सूरत : एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत करता येईल. सर्व अडथळे दूर करून हा प्रकल्प लवकर पूर्ण

प्रारुप मतदार यादीवरील हरकती, सुचनांची गांभीर्याने दखल घ्या

महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई