मुंबईकरांना पाण्याचे ‘नो टेन्शन’

सीमा दाते


मुंबई : सध्या वाढती उष्णता आणि मे महिना असल्याने मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याची चिंता आहे. मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये २१.९९ टक्के इतका पाणी साठा शिल्लका आहे. हा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना पाणीटंचाईची भीती नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


सध्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे अनेक ग्रामीण भागात पाण्याची अडचणी निर्माण झाली आहे. त्यातच जमा असलेल्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवन होत असते. यामुळे मुंबईतही पाणीटंचाई होईल की काय, अशी भीती होती. मात्र आतापर्यंत मुंबईकरांना पाणीटंचाईची चिंता करण्याची गरज नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सातही तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात अनेकदा पाणीसाठा कमी शिल्लक राहिल्याने मुंबईत १० ते १५ टक्के पाणीकपात होते. मात्र या वर्षी कपातीची गरज भासणार नाही, असे दिसत आहे.




 

भातसा तलावात १ लाख ६१ हजार ९०० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. मध्य वैतरणा तलावातही सुमारे ८२ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मोडक सागर तलावात ४३ हजार, तर तानसामध्ये २२ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक असल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून सांगण्यात आले.


 

मुंबई शहराला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे महिना सरासरी १ लाख १५ हजार ते १ लाख १९ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासते. तलावातील पाण्याचा साठा लक्षात घेता, हे पाणी जुलै मध्यापर्यंत पुरेल इतके आहे.

Comments
Add Comment

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड

आरे, वाकोला व विक्रोळीतल्या उड्डाणपुलांची डागडुजी करणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा.

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक