सार्वजनिक रस्त्यात अडथळा; पिंगळस ग्रामपंचायतीचा कानाडोळा

कर्जत (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील पिंगळस येथील सरकारी सर्व्हे न ४५/४ क्षेत्र ०.२३.० क्षेत्रापैकी व क्षेत्रासह खुला सार्वजनिक रस्ता अंदाजे १७ ते १८ फूट रुंद असलेला पूर्वापार ग्रामस्थ, शेतकरी यांचा वापर वहिवाटीत आहे तसेच पिंगळस स्मशानभूमीकडे जाणाऱ्या या सार्वजनिक रस्त्यात अतिक्रमण करून दिलीप विष्णू कदम यांनी वहिवाटीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी याबाबत तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी पिंगळस ग्रामपंचायतीला सदरील बांधकाम तोडण्याचे आदेश दिले आहेत.


मात्र ग्रामपंचायत अद्यापपर्यंत भूमिका का घेत नाही याबाबत तक्रारदार अनंता दिसले यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. पिंगळस ग्रामपंचायत हद्दीत स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कायमस्वरूपी खुला ठेवला आहे. पिंगळस ते आंबिवली धामणी मुख्य रस्त्यापासून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्याच्या भागात दिलीप कदम यांनी रस्त्याच्या बाजूला कठडा उभारल्याने ये- जा करणाऱ्या वाहनांना अडथळा होत आहे. या कठड्याला गाड्यांचे पार्ट घासून नुकसान होत आहे.


कदम यांनी केलेले बांधकाम ग्रामपंचायतीने त्वरित हटवून रस्ता मोकळा करावा याकरिता अजय दिसले, मनोहर भोईर यांनी तहसील, पंचायत समिती कार्यालयात २०१६ पासून पत्रव्यवहार करत होते. याबाबत घटनास्थळी अधिकारी वर्गानी पाहणी करून बांधकाम तोडण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याचे अनंता दिसले यांचे म्हणणे आहे.


जिवे मारण्याच्या धमक्या देऊन खुलेआम बांधकाम करीत आहे. ग्रामपंचायतींना आदेश दिले असूनही ग्रामपंचायत फक्त नामधारी नोटीस बजावत आहे मात्र कारवाई काहीच नाही. -अनंता दिसले (तक्रारदार, पिंगळस)


कदम यांना नोटीस काढण्यात आली होती. पण राजकीय दबाव येत असल्याने बांधकाम हटविण्यास विलंब होत आहे. परंतु लवकरच पोलीस बंदोबस्त घेऊन बांधकाम तोडण्यात येईल. -रमेश देशमुख (सरपंच, पिंगळस)


अनधिकृत कठड्याबाबत नोटीस बजाविण्यात आली होती तेव्हा कदम यांनी दमदाटी केली होती. पुन्हा आम्ही नोटीस बजावून आठ दिवसांची मुदत देण्यात येणार अन्यथा पोलीस बंदोबस्त घेऊन बांधकाम तोडण्यात येईल.
-राम म्हात्रे (ग्रामसेवक)

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग