मुंबईत २ दिवसांत मान्सूनपूर्व पावसाचा इशारा

मुंबई : यंदा मान्सून वेळेआधी दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. सोमवारी मान्सून अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल झाला आहे. यामुळे केरळमध्ये मान्सून चार दिवस तर मुंबईत ३ दिवस आधीच मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पण यासोबतच शुक्रवारपर्यंत मुंबईमध्ये प्री-मान्सूनची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञ दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, मान्सूनचा आतापर्यंत प्रवास चांगला राहिल्यामुळे २० ते २१ मे रोजी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.


वेळेआधीच मान्सून सुरू होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे पालिकेसमोर साफसफाईचे मोठे आव्हान आहे. मान्सूनपूर्व नाल्याची सफाई अद्यापही पूर्ण झालेली नाही. बीएमसीने नाले सफाईसाठी ३१ मे ही तारीख निश्चित केली आहे. आतापर्यंत नाल्याच्या साफसफाईचे अनेक काम बाकी आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मान्सूनपूर्व पाऊस झाल्यास नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.


दिनेश मिश्रा म्हणाले की, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास चांगला झाला. त्यामुळे केरळसह मुंबईत मान्सून वेळेआधी दाखल होईल. दुसरीकडे, केरळच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीसह राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री