आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बुस्टर डोसच्या कालावधीत कपात

  56

मुंबई (प्रतिनिधी) : कोविड प्रतिबंधात्मक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या प्रौढ व्यक्तींना दुसरी मात्रा घेतल्यानंतर ९ महिन्यांनी प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येत आहे. मात्र आता आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना हा कालावधी ९ महिन्यांऐवजी ९० दिवस करण्यात आला आहे.


विविध कारणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास करणे गरजेचे असणाऱ्या व्यक्तींना या कालावधीत सवलत देण्यात यावी, अशी मागणी होत होती. या अनुषंगाने संबंधित तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार यात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या निर्णयानुसार ज्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय प्रवास करणे गरजेचे आहे आणि ज्या देशात त्यांना जायचे आहे, त्या देशातील नियमांनुसार प्रतिबंधात्मक मात्रा घेतलेली असणे गरजेचे आहे, अशा व्यक्तींना आता दुसरा डोस घेतल्यानंतर किमान ९० दिवसांनी तिसरा डोस घेता येणार आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कळविली असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.


दरम्यान वरील तपशिलानुसार ‘कोविन अॅप’मध्ये व संबंधित संगणकीय प्रणालीत आवश्यक ते बदल केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या स्तरावर करण्यात आले असल्याचेही पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे अधिकारी कंटाळले प्रशासनाच्या कार्यपद्धतीला

रिक्त पदांअभावी अतिरिक्त कामांची जबाबदारी आणि चौकशीचा ससेमिरा मुंबई:मुंबई महापालिकेचा कारभारात आता

दादर स्थानक परिसरात पोलिसांना न जुमानता होतो व्यवसाय

पण गावातील महिलांना दिला जातो त्रास मुंबई :मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमान सध्या दादरसह इतर

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेन

भारत गौरव ट्रेन टूरला १०० टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद नवी दिल्ली :इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक

समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ

मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल

शालेय बस चालकांची दर आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचा निर्णय मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस