औरंगजेबचे थडगे जमीनदोस्त करण्याची मनसेची मागणी

  111

मुंबई : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावरुन सत्ताधारी शिवसेनेपासून ते विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपापर्यंत सर्वच प्रमुख पक्षांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान असे असतानाच आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगजेबचे हे थडगे उद्धवस्त करण्याची मागणी केली आहे. राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या मुलाखतीचा संदर्भ देत मनसेने ही मागणी केली आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी पक्षाची भूमिका मांडताना शिवसेनेला हिंदुत्ववादाच्या मुद्द्याचा संदर्भ देत हे थडगे उद्धवस्त करण्याची मागणी केली आहे. “१८ डिसेंबर २००० रोजी ‘सामना’मध्ये दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब म्हणतात, “संभाजीनगर येथे असलेले हे औरंगजेबाचे थडगे जमीनदोस्त झाले पाहिजे. तसेच पुन्हा बांधता कामा नये.” शिवसेनेचे हे सरकार आदरणीय बाळासाहेबांचे तरी ऐकणार आहे का? हे थडगे जमीनदोस्त होणार आहे का?” असे प्रश्न मनसेने उपस्थित केले आहेत.


तसेच पुढे बोलताना हे थडगे काय अकबरूद्दीन औवेसींसारख्यांना नतमस्तक होण्यासाठी ठेवले आहे का, असा सवाल मनसेने थेट औवेसींचा उल्लेख टाळत केला. “या शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय आहे? ही निजामाची औलाद येथे येऊन या थडग्यावर नतमस्तक होणार. यासाठी हे थडगे ठेवले आहे का?,” असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केला आहे.


“आपण संभाजी नगरच्या नामकरणावरुन पलटी मारलेली आहे. बाळासाहेबांनी सांगितलेल्या रस्त्यावरील नमाज, भोंग्यांसंदर्भातील भूमिकेवरुन पलटी मारलेली आहे. किमान बाळासाहेबांचे हे ऐकून या शिवरायांच्या महाराष्ट्रात हे थडगे आपण तोडून टाकणार आहात का?, हा आमचा नेमका सवाल आहे. असली नकलीच्या गप्पा मारणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनी आता आपला चेहरा दाखवूनच द्यावा, असे आम्ही आव्हान देतो,” असेही काळे यांनी म्हटले आहे.


या अनुषंगाने बोलताना माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी, शाळा बांधताय याबद्दल अभिनंदन, पण औरंगजेबाच्या कबरीसमोर नस्तमस्तक होणे ही कृती तेढ निर्माण करणारी असल्याचे म्हटले आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या