अनिल खेडेकर
भाईंदर : मीरा-भाईंदर, वसई विरार परिसरातील गुन्हेगारी नष्ट करत असतानाच पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयाने गुन्ह्यांचा योग्य रीतीने तपास करत तसेच ठोस पुरावे सादर केल्यामुळे गुन्हे सिद्ध करण्यात ८९.६३% गुण मिळाले असून महाराष्ट्र राज्यात आयुक्तालयाने पहिला क्रमांक पटकावला आहे.
ठाणे तसेच पालघर ग्रामिण पोलीस अधीक्षक कार्य क्षेत्रात असणाऱ्या मीरा-भाईंदर, वसई विरार भागातील पोलीस ठाणे एकत्रित करून या दोन शहरांसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना १ ऑक्टोबर २०२० मध्ये करण्यात आली. नव्याने स्थापन झालेल्या आयुक्तालायची जबाबदारी सदानंद दाते यांच्यावर सोपविण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयात शिक्षा होण्याचे प्रमाण ५५. ३६ टक्के आहे. नुकतीच या वर्षीच्या दोषींची आकडेवारी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये महाराष्ट्रात सर्व पोलीस आयुक्तालयामधून गुन्हे सिद्ध करण्यामध्ये ८९.६३ टक्के गुण मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाला मिळाले आहेत.
त्याचबरोबर नव्याने स्थापन झालेल्या या आयुक्तालयाने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर ५८.४९ टक्के गुण मिळवून अमरावती पोलीस आयुक्तालय दुसऱ्या क्रमांकावर, ५४.७८ टक्के गुण मिळवून नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर, तर ५४.०८ टक्क्यांसह ठाणे शहर चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई, नागपूरसारखी मोठी शहरी आयुक्तालय दूर पडली असून मुंबईला ५२.१८ तर नागपूरला ५१.६३ टक्के गुण मिळून ते पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर गेले आहेत.
पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…
चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे…
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…