म्हाडा वसईत ७५ हजार ९८१ परवडणारी घरे बांधणार, ३१ मे रोजी सोडत!

  125

अत्यल्प उत्पन्न गटासाठी : ३०६ चौरस फुटांचे घर


अल्प उत्पन्न गटासाठी : ३२० चौरस फुटांचे घर


मुंबई : सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न साकार व्हावे म्हणून म्हाडा सातत्याने क्रियाशील असून, आता वसई येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३६० एकरवर सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. म्हाडाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर हा प्रकल्प मंजूर केला आहे आणि या प्रकल्पात ७५ हजार ९८१ घरे उभारली जातील.


म्हाडाने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प मंजूर झालेला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रकल्प मंजूर करण्यासाठी म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॉन्सेपच्युअल ॲडव्हायजरी सर्व्हिसेस एलएलपी कंपनीच्या वसई येथील प्रकल्पाला मान्यता दिली आहे.


सुरक्षा स्मार्ट सिटीमार्फत सोडतीद्वारे याचे वितरण होईल. अत्यल्प उत्पन्न गटात ४५ हजार १७२ घरे असतील. त्यापैकी २७ हजार घरे म्हाडाच्या दरानुसार सोडतीसाठी असतील.


अल्प उत्पन्न गटात ३० हजार ८२९ घरे असणार आहेत. यापैकी १७ हजार घरे म्हाडा दराप्रमाणे उपलब्ध होतील. घरांची किंमत २२ लाख ५० हजार रुपये असेल.


अत्यल्प गटातील विजेत्यांना २.५ लाखांची सवलत मिळेल. अत्यल्प उत्पन्न गटातील घरांसाठी पीएमएवायचे अनुदान मिळणार नाही. अत्यल्प उत्पन्न गटाला मुद्रांक शुल्काची रक्कम १ हजार आहे. अत्यल्प गटातील २ हजार ५०० घरांची सोडत ३१ मे रोजी काढली जाईल.

Comments
Add Comment

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना