पालिकेच्या अधिकाऱ्यांना वृक्ष छाटणीचे प्रशिक्षण

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील वृक्षांची योग्य प्रकारे जोपासना कशी करावी?, आवश्यकतेनुसार शास्त्रोक्त पद्धतीने वृक्ष छाटणी कशी करावी? व छाटणी करताना पक्ष्यांच्या घरट्यांची कशी काळजी घ्यावी? आदी पैलूंसंदर्भात महानगरपालिकेच्या उद्यान अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय वृक्षतज्ज्ञ परिषदेमार्फत प्रमाणित वृक्षतज्ज्ञांकडून बुधवारी प्रशिक्षण देण्यात आले.

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी, तसेच कंत्राटदारांकडे असलेले उद्यान विषयक तज्ज्ञ व त्यासोबत मुंबईतील ज्या आस्थापनांकडे उद्यान विषयक तज्ज्ञ आहेत, अशा मुंबईतील बहुतांश उद्यान विषयाशी निगडित अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आयोजित या उपक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय वृक्षतज्ज्ञ परिषदेमार्फत प्रमाणित वृक्षतज्ज्ञ वैभव राजे व इतर तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले. पावसाळ्यात करण्यात येणारी वृक्षांची छाटणी/कापणी याविषयी मार्गदर्शनपर सत्रासह प्रात्यक्षिक देखील यामध्ये समाविष्ट होते.

उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादार यांनी मार्गदर्शनपर भाषणात उपस्थितांना वृक्ष छाटणी करताना नागरिकांच्या व कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या सूचना दिल्या. तसेच पावसाळ्यात आपत्कालीन कक्ष व विभाग कार्यालयातील आपत्कालीन कक्ष यांच्याशी समन्वय साधून मुंबईकरांना जास्तीत-जास्त योग्य प्रकारे सेवा देण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

20 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

41 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

1 hour ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago