नवी मुंबईत भरणार पहिला फ्लेमिंगो महोत्सव

  103

उरण (वार्ताहर) : जागतिक स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी १४ मे रोजी शहरात फ्लेमिंगो महोत्सव भरविण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईतील अशा प्रकारचा हा पहिलाच महोत्सव असणार आहे. विशेष म्हणजे, स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत महापालिकेने नवी मुंबई शहराला फ्लेमिंगो सिटीचा दर्जा देण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आहे.


त्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाला महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातील स्थलांतरित पक्ष्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात जागतिक स्तरावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी मे आणि सप्टेंबर महिन्यात असे दोन वेळा जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस साजरा केला जातो.


या अंतर्गत स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊहापोह केला जातो. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण मोठे आहे. या परदेशी पाहुण्यांच्या स्थलांतराच्या जागा सुरक्षित कराव्यात, यासाठी पर्यावरणप्रेमींचा संघर्ष सुरू आहे. त्याला मोठ्या प्रमाणात यशही प्राप्त झाले आहे.


शहरातील स्थलांतरित पक्ष्यांचे लक्षणीय प्रमाण लक्षात घेऊन, नवी मुंबई महापालिकेनेही सकारात्मक पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नवी मुंबईला प्लेमिंगो सिटीचा दर्जा दिला आहे. त्यानुसार, शहरात ठिकठिकाणी फ्लेमिंगोंचे आकर्षक शिल्प उभारले आहेत. पालिकेच्या या प्रयासाला बळ देण्याच्या हेतूने आता नवी मुंबईत पहिला फ्लेमिंगो महोत्सव भरविणार आहे.

Comments
Add Comment

पोलादपूर तालुक्यात पर्यावरण दिन ठरला ‘प्रदूषण दिन’

खासगी ठेकेदार नेमल्याने हातरिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान पोलादपूर : जगभरात ५ जूनचा दिवस हा पर्यावरण दिन म्हणून

राजिपच्या शाळांमध्ये शिक्षकांची एक हजारांहून अधिक पदे रिक्त

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची होणार आबाळ अलिबाग : रायगड जिल्ह्यात राजिपच्या शाळांमध्ये शिक्षकांची एक हजारांहून

निधीच्या प्रतीक्षेत विरार-अलिबाग कॉरिडॉर

एमएसआरडीसी यंत्रणेकडून अद्याप प्रस्तावावर प्रश्नचिन्ह अलिबाग:विसर-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका बांधण्यासाठी

रायगडावर ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आज (शुक्रवार, ६ जून

पीक कर्जाची मार्चअखेर १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करा

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळेंच्या हस्ते जिल्हा पतपुरवठा पुस्तिकेचे

अवकाळीमुळे शेतकरी, मच्छीमार, बागायतदारांचे नुकसान

भरपाईसाठी पावले उचलण्याची शेकापची मागणी अलिबाग : अवकाळी पावसामुळे शेतकरी, मच्छीमार, बागायतदारांचे मोठे नुकसान