राणा कुटुंबीयांच्या घरात अनधिकृत बांधकाम

मुंबई (प्रतिनिधी) : खार येथील राणा कुटुंबीयांच्या घरात अनधिकृत बांधकाम केले असल्याचे पालिकेच्या पाहणी पथकाला आढळले आहे. त्यामुळे पालिकेकडून राणा यांना रितसर नोटीस पाठवण्यात येणार आहे.


खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे मुंबईतील खार येथील १४व्या रस्त्यावरील लाव्ही या इमरातीच्या ८ व्या मजल्यावर घर आहे. सलग दोन दिवस पालिकेचे पाहणी पथक राणा यांच्या घरी गेले होते. मात्र राणा दाम्पत्य घरी नसल्याने पाहणी न करता पथकाला परतावे लागले होते. सोमवारी पुन्हा हे पथक पाहणीसाठी गेले असता त्यांना घरात अनधिकृत बांधकाम झाले असल्याचे आढळले आहे. दरम्यान पालिकेच्या एच पश्चिम विभागाने नोटीस दिली आहे.


दरम्यान मंजूर आराखड्याव्यतिरिक्त घरात बदल केले असल्याचे पथकाला आढळून आले आहे. त्यामुळे राणा यांना लवकरच १५ दिवसांच्या मुदतीची नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. १५ दिवसांत त्यांना आपले म्हणणे मांडण्याची तसेच या बांधकामासंदर्भात परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली जाणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मंगळवारी 'या' भागात होणार पाणी कपात

मुंबई: मुंबईकरांसाठी फार महत्वाची बातमी समोर आली आहे. मंगळवार १० फेब्रुवारी रोजी मुंबईमधल्या अनेक ठिकाणी पाणी

रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०