समुद्रात मीठाबरोबर साखरही!

मुंबई : समुद्राच्या आतमध्ये साखरेचा एक मोठा स्त्रोतदेखील आहे. सागरी गवताच्या स्वरूपात असलेल्या या स्त्रोतामध्ये सुक्रोज असते. स्वयंपाकघरातल्या साखरेचा हा मुख्य घटक आहे. समुद्राच्या तळाशी असलेल्या सागरी गवतामध्ये १.३ दशलक्ष टन साखरेचा साठा आहे. तो ३२ अब्ज शीतपेयांच्या गोडव्याइतका आहे. जर्मनीतल्या ‘मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर मरिन मायक्रोबायोलॉजी’मध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनातून ही बाब समोर आली.


प्रकाश संष्लेषणादरम्यान साखर तयार होते. सीग्रास त्यांच्या चयापचयासाठी सुक्रोज वापरतात. सागरी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ निकोल डुबिलियर म्हणतात की, समुद्री गवत प्रकाश संष्लेषणादरम्यान साखर तयार करते. संशोधकांनी त्यांच्या गृहितकांची पाण्याखालील सीग्रास कुरणात मास स्पेक्ट्रोमेट्री तंत्राद्वारे चाचणी केली. तेव्हा असे आढळून आले की, सरासरी प्रकाशात हे सीग्रास त्यांच्या चयापचयासाठी सुक्रोज वापरतात, परंतु अधिक सूर्यप्रकाशात, जसे की दुपार किंवा उन्हाळ्यात या वनस्पती जास्त साखर तयार करतात. मग ते त्यांच्या रायझोस्फियरमध्ये अधिक सुक्रोज सोडतात. ही साखर आजूबाजूच्या वातावरणातले सूक्ष्म जीव शोषून घेत नाही. हे टाळण्यासाठी, सीग्रास इतर अनेक वनस्पतींप्रमाणेच फेनोलिक संयुगे पाठवते.


रेड वाईन, कॉफी आणि फळे तसेच निसर्गात इतर अनेक ठिकाणी आढळणारी ही रासायनिक संयुगे प्रतिजैविक आहेत आणि बहुतेक सूक्ष्म जीवांचे चयापचय रोखतात. त्यांचा वेग कमी करतात. सीग्रास ३५ पट वेगाने दुप्पट कार्बन शोषून घेतो. समुद्रातल्या गवताच्या कार्बन कॅप्चर नुकसानाची गणना करताना दिसून आले की, मानवी क्रियाकलापांमुळे आणि पाण्याची गुणवत्ता खालावल्यामुळे सुक्रोजचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे निळ्या कार्बन परिसंस्थेचे जतन करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

सरकारी कर्मचारी आता झोहो ईमेल प्लॅटफॉर्मवर, १२ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचे अकाउंट झोहोवर

मुंबई : पंतप्रधान कार्यालयासह केंद्र सरकारमधील सुमारे १२ लाख कर्मचाऱ्यांचे ई-मेल पत्ते आता राष्ट्रीय माहिती

मुंबईतील दस्त नोंदणीसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय!

मुंबई: महाराष्ट्राच्या महसूल विभागाने मुंबईतील नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठी 'दिवाळी भेट' दिली आहे. यापुढे

मध्य रेल्वे पुन्हा उशिराने, लोकल अर्धा तास लेट, कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा

मुंबई: मुंबईची 'लाइफलाइन' मानली जाणारी लोकल सेवा, विशेषत: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. आज

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार ६ लाख रुपयांची भरपाई, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूंच्या वाढत्या घटनांवर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत

मुंबईतील राडारोडा प्रक्रिया केंद्राला अल्प प्रतिसाद, प्रशासनासमोर ही आव्हाने

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईत घरगुती व लहान स्तरावर निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) संकलित करणे, वाहून नेणे व

दादरच्या गजबजलेल्या डिसिल्व्हा रस्त्यावर फटाक्यांची मोठी दुकाने, स्थानिकांच्या मनात जुन्या दुर्घटनेची भिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त आता फटाक्यांच्या विक्रीला सुरुवात झाली असून अशाप्रकारची दुकाने