समुद्रात मीठाबरोबर साखरही!

मुंबई : समुद्राच्या आतमध्ये साखरेचा एक मोठा स्त्रोतदेखील आहे. सागरी गवताच्या स्वरूपात असलेल्या या स्त्रोतामध्ये सुक्रोज असते. स्वयंपाकघरातल्या साखरेचा हा मुख्य घटक आहे. समुद्राच्या तळाशी असलेल्या सागरी गवतामध्ये १.३ दशलक्ष टन साखरेचा साठा आहे. तो ३२ अब्ज शीतपेयांच्या गोडव्याइतका आहे. जर्मनीतल्या ‘मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर मरिन मायक्रोबायोलॉजी’मध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनातून ही बाब समोर आली.


प्रकाश संष्लेषणादरम्यान साखर तयार होते. सीग्रास त्यांच्या चयापचयासाठी सुक्रोज वापरतात. सागरी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ निकोल डुबिलियर म्हणतात की, समुद्री गवत प्रकाश संष्लेषणादरम्यान साखर तयार करते. संशोधकांनी त्यांच्या गृहितकांची पाण्याखालील सीग्रास कुरणात मास स्पेक्ट्रोमेट्री तंत्राद्वारे चाचणी केली. तेव्हा असे आढळून आले की, सरासरी प्रकाशात हे सीग्रास त्यांच्या चयापचयासाठी सुक्रोज वापरतात, परंतु अधिक सूर्यप्रकाशात, जसे की दुपार किंवा उन्हाळ्यात या वनस्पती जास्त साखर तयार करतात. मग ते त्यांच्या रायझोस्फियरमध्ये अधिक सुक्रोज सोडतात. ही साखर आजूबाजूच्या वातावरणातले सूक्ष्म जीव शोषून घेत नाही. हे टाळण्यासाठी, सीग्रास इतर अनेक वनस्पतींप्रमाणेच फेनोलिक संयुगे पाठवते.


रेड वाईन, कॉफी आणि फळे तसेच निसर्गात इतर अनेक ठिकाणी आढळणारी ही रासायनिक संयुगे प्रतिजैविक आहेत आणि बहुतेक सूक्ष्म जीवांचे चयापचय रोखतात. त्यांचा वेग कमी करतात. सीग्रास ३५ पट वेगाने दुप्पट कार्बन शोषून घेतो. समुद्रातल्या गवताच्या कार्बन कॅप्चर नुकसानाची गणना करताना दिसून आले की, मानवी क्रियाकलापांमुळे आणि पाण्याची गुणवत्ता खालावल्यामुळे सुक्रोजचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे निळ्या कार्बन परिसंस्थेचे जतन करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील