हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद होण्याची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) : उन्हाळ्यात लोकल प्रवाशांना एसी लोकलने प्रवास करता यावा यासाठी रेल्वेने काही दिवसांपूर्वी एसी लोकलचे तिकीट दर कमी केले आहेत. त्यानंतर मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. मात्र यामुळे आता हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद होण्याची शक्यता आहे.


हार्बर मार्गावरील एसी लोकलला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. मात्र यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/कसारा/कर्जत या मुख्य मार्गावरील वातानुकूलित लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाल्याने हार्बर मार्गावरील एसी ट्रेन बंद करून त्या मुख्य मार्गावर चालवण्यात येणार असल्याचे समजते. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर हार्बर मार्गावर एसी लोकल फेऱ्या पूर्णपणे बंद केल्या जाण्याची शक्यता आहे.


मे महिन्यात ८ तारखेपर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वेमधून दररोज सरासरी २८ हजार १४१ प्रवाशांनी प्रवास केला. यातील मुख्य मार्गावरील प्रवासी संख्या २४ हजार ८४२ होती तर हार्बर मार्गावरील प्रवासी संख्या ३ हजार २९९ इतकी होती. तिकीट दर कमी झाल्याने प्रवाशांच्या संख्येत जवळपास ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर सुट्टीच्या दिवशी तसेच रविवारी सुद्धा एसी ट्रेन चालवण्यात येतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे, तर ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल फेऱ्या बंद करण्यात आल्या असून सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव दरम्यानच्या ३२ एसी ट्रेनपैकी १६ फेऱ्या बंद करून त्याऐवजी सामान्य गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत