हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद होण्याची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) : उन्हाळ्यात लोकल प्रवाशांना एसी लोकलने प्रवास करता यावा यासाठी रेल्वेने काही दिवसांपूर्वी एसी लोकलचे तिकीट दर कमी केले आहेत. त्यानंतर मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. मात्र यामुळे आता हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद होण्याची शक्यता आहे.


हार्बर मार्गावरील एसी लोकलला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. मात्र यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/कसारा/कर्जत या मुख्य मार्गावरील वातानुकूलित लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाल्याने हार्बर मार्गावरील एसी ट्रेन बंद करून त्या मुख्य मार्गावर चालवण्यात येणार असल्याचे समजते. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर हार्बर मार्गावर एसी लोकल फेऱ्या पूर्णपणे बंद केल्या जाण्याची शक्यता आहे.


मे महिन्यात ८ तारखेपर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वेमधून दररोज सरासरी २८ हजार १४१ प्रवाशांनी प्रवास केला. यातील मुख्य मार्गावरील प्रवासी संख्या २४ हजार ८४२ होती तर हार्बर मार्गावरील प्रवासी संख्या ३ हजार २९९ इतकी होती. तिकीट दर कमी झाल्याने प्रवाशांच्या संख्येत जवळपास ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर सुट्टीच्या दिवशी तसेच रविवारी सुद्धा एसी ट्रेन चालवण्यात येतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे, तर ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल फेऱ्या बंद करण्यात आल्या असून सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव दरम्यानच्या ३२ एसी ट्रेनपैकी १६ फेऱ्या बंद करून त्याऐवजी सामान्य गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.