हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद होण्याची शक्यता

  43

मुंबई (प्रतिनिधी) : उन्हाळ्यात लोकल प्रवाशांना एसी लोकलने प्रवास करता यावा यासाठी रेल्वेने काही दिवसांपूर्वी एसी लोकलचे तिकीट दर कमी केले आहेत. त्यानंतर मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. मात्र यामुळे आता हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद होण्याची शक्यता आहे.


हार्बर मार्गावरील एसी लोकलला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. मात्र यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/कसारा/कर्जत या मुख्य मार्गावरील वातानुकूलित लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाल्याने हार्बर मार्गावरील एसी ट्रेन बंद करून त्या मुख्य मार्गावर चालवण्यात येणार असल्याचे समजते. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर हार्बर मार्गावर एसी लोकल फेऱ्या पूर्णपणे बंद केल्या जाण्याची शक्यता आहे.


मे महिन्यात ८ तारखेपर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वेमधून दररोज सरासरी २८ हजार १४१ प्रवाशांनी प्रवास केला. यातील मुख्य मार्गावरील प्रवासी संख्या २४ हजार ८४२ होती तर हार्बर मार्गावरील प्रवासी संख्या ३ हजार २९९ इतकी होती. तिकीट दर कमी झाल्याने प्रवाशांच्या संख्येत जवळपास ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर सुट्टीच्या दिवशी तसेच रविवारी सुद्धा एसी ट्रेन चालवण्यात येतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे, तर ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल फेऱ्या बंद करण्यात आल्या असून सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव दरम्यानच्या ३२ एसी ट्रेनपैकी १६ फेऱ्या बंद करून त्याऐवजी सामान्य गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही