राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटेल

राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र


मुंबई : राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटून उठेल हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मला जीवे मारण्याच्या धमकीचे एक पत्र माझ्या लालबागच्या पक्ष कार्यालयात आले असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. याच पत्रासंदर्भात बाळा नांदगावकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे संबंधित पत्र सुपूर्द केले. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली.


"माझ्या लालबागच्या कार्यालयात काल एक धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यात मला आणि राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत मी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मी राज ठाकरेंना ते पत्र दाखवले व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून संबंधित पत्र त्यांच्याकडे दिले आहे. आता ते याबाबत चौकशी करतील. गृहमंत्र्यांनी तातडीने पोलीस आयुक्तांशी बोलून याचा तपास करण्याचे आश्वासन मला दिले आहे. पण एक सांगतो. मला दिलेली धमकी एक वेळ ठीक. पण राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटून उठेल हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे", असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.


अजान संदर्भात तुम्ही सुरू केलेले आंदोलन थांबवा नाहीतर तुम्हाला तर जीवानिशी मारूच पण तुमच्या राज ठाकरेंचाही जीव घेऊ, अशी धमकी पत्रातून देण्यात आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. पत्र हिंदी भाषेत असून यात काही ऊर्दू ओळींचाही समावेश असल्याचे नांदगावकर म्हणाले. पत्र राज्य सरकारकडे सुपूर्द केले आहे. आता ते त्याची चौकशी करतील अशी आशा आम्हाला आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशीही मागणी यावेळी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला