राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटेल

राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र


मुंबई : राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटून उठेल हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मला जीवे मारण्याच्या धमकीचे एक पत्र माझ्या लालबागच्या पक्ष कार्यालयात आले असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. याच पत्रासंदर्भात बाळा नांदगावकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे संबंधित पत्र सुपूर्द केले. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली.


"माझ्या लालबागच्या कार्यालयात काल एक धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यात मला आणि राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत मी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मी राज ठाकरेंना ते पत्र दाखवले व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून संबंधित पत्र त्यांच्याकडे दिले आहे. आता ते याबाबत चौकशी करतील. गृहमंत्र्यांनी तातडीने पोलीस आयुक्तांशी बोलून याचा तपास करण्याचे आश्वासन मला दिले आहे. पण एक सांगतो. मला दिलेली धमकी एक वेळ ठीक. पण राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटून उठेल हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे", असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.


अजान संदर्भात तुम्ही सुरू केलेले आंदोलन थांबवा नाहीतर तुम्हाला तर जीवानिशी मारूच पण तुमच्या राज ठाकरेंचाही जीव घेऊ, अशी धमकी पत्रातून देण्यात आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. पत्र हिंदी भाषेत असून यात काही ऊर्दू ओळींचाही समावेश असल्याचे नांदगावकर म्हणाले. पत्र राज्य सरकारकडे सुपूर्द केले आहे. आता ते त्याची चौकशी करतील अशी आशा आम्हाला आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशीही मागणी यावेळी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

Comments
Add Comment

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.