वांद्र्यात बिल्डरच्या घशात भूखंड घालून ३ हजार कोटींचा घोटाळा

मुंबई (प्रतिनिधी) : वांद्रे पश्चिम बॅन्डस्टँड परिसरातील ताज हॉटेल शेजारी असणाऱ्या सरकारी मालकीचा भूखंड बिल्डरच्या घशात घालून सुमारे तीन हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या पंचतारांकित जागेवर “एसआरए” योजना दाखवून एसआरए योजनेतील लाभ व एफएसआय बिल्डरला देण्यात येणार असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आमदार अॅड. आशीष शेलार यांनी केला.


आशीष शेलार यांनी ५ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन हा भूखंड घोटाळा उघड केला होता. त्यावेळी त्यांनी या प्रकरणात १ हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. त्याबाबत खुलासा उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी करून यामध्ये कोणत्याही प्रकारे घोटाळा झाला नसल्याचे प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. त्या खुलाशाला आज उत्तर देणार नाही, योग्य वेळी आपण त्यावर बोलू असे सांगत आमदार अॅड. आशीष शेलार यांनी मंगळवारी पुन्हा दादर वसंत स्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याच घोटाळ्यातील आणखी एक गंभीर बाब उघड करून नवीन आरोप केले आहेत.


आशीष शेलार म्हणाले की, या भूखंडावर १६८ कायमस्वरूपी संक्रमण शिबिरातील घरे बिल्डर बांधून देणार, असे दाखवून या मोकळ्या भूखंडावर एसआरए योजना राबविण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे संक्रमण शिबिराच्या नावाखाली विकासकाला एसआरए योजनेचे फायदा देण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,