तीन लाखांची लाच; दलालास ६ महिन्यांची सक्तमजुरी

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे ग्रामीण एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी थिनरने भरलेला टँकर सिल्व्हासा येथून गोवा येथील कंपनीत जात असताना योग्य कागदपत्र नसल्याने अडकवून ठेवला होता. तसेच टँकर सोडविण्यासाठी व टँकर मालकाला अटक न करण्यासाठी फिर्यादी संदीप सिंह यांच्याकडे तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.


सदर एलसीबी ठाणे ग्रामीणचे तपास अधिकारी व त्यांचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्यावतीने लाच स्वीकारण्यासाठी त्यांचा दलाल हिंमत ऊर्फ हेमराज हिरजी नंदा यास ठाणे आरटीओजवळील हॉटेलमध्ये बोलवले होते, अशी तक्रार संदीप सिंह यांनी ऑगस्ट २००३ मध्ये केली होती.


या प्रकरणी मुंबई लाचलुचपत कार्यालयात संदीप यांनी महासंचालकांची भेट घेऊन तक्रार केली. याप्रकरणी मुंबई येथील अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी विनंती केली. फिर्यादीच्या विनंतीवरून महासंचालकांनी सहाय्यक पोलीस आयुक्त विलास तुपे, रमेश महाले आणि इतर अधिकारी व अंमलदार यांचे पथक कामगिरीवर नेमले. ठाणे येथील सदर हॉटेलमध्ये सापळा लावला असता, ठाणे ग्रामीण पोलिसांचा दलाल हेमराज हिरजी नंदा रात्री ११ वा. हॉटेलमध्ये आला. त्याने सदर लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यास रंगेहाथ पकडले होते.

Comments
Add Comment

आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आरोग्य विभागाला निर्देश ठाणे : आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड

ठाण्यात वाघीण मैदानात! चित्रा वाघ ॲक्शन मोडवर; वाघ यांच्या एन्ट्रीने अनेकांची धाकधूक वाढली!

कळवा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज

नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त ठाणे  : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा

सुजाता मडके या शहापूरच्या कन्येची ‘इस्रो’मध्ये थरारक झेप

ठाणे : ‘यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते,’ या शब्दात

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प