तीन लाखांची लाच; दलालास ६ महिन्यांची सक्तमजुरी

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे ग्रामीण एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी थिनरने भरलेला टँकर सिल्व्हासा येथून गोवा येथील कंपनीत जात असताना योग्य कागदपत्र नसल्याने अडकवून ठेवला होता. तसेच टँकर सोडविण्यासाठी व टँकर मालकाला अटक न करण्यासाठी फिर्यादी संदीप सिंह यांच्याकडे तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.


सदर एलसीबी ठाणे ग्रामीणचे तपास अधिकारी व त्यांचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्यावतीने लाच स्वीकारण्यासाठी त्यांचा दलाल हिंमत ऊर्फ हेमराज हिरजी नंदा यास ठाणे आरटीओजवळील हॉटेलमध्ये बोलवले होते, अशी तक्रार संदीप सिंह यांनी ऑगस्ट २००३ मध्ये केली होती.


या प्रकरणी मुंबई लाचलुचपत कार्यालयात संदीप यांनी महासंचालकांची भेट घेऊन तक्रार केली. याप्रकरणी मुंबई येथील अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी विनंती केली. फिर्यादीच्या विनंतीवरून महासंचालकांनी सहाय्यक पोलीस आयुक्त विलास तुपे, रमेश महाले आणि इतर अधिकारी व अंमलदार यांचे पथक कामगिरीवर नेमले. ठाणे येथील सदर हॉटेलमध्ये सापळा लावला असता, ठाणे ग्रामीण पोलिसांचा दलाल हेमराज हिरजी नंदा रात्री ११ वा. हॉटेलमध्ये आला. त्याने सदर लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यास रंगेहाथ पकडले होते.

Comments
Add Comment

ठाण्यात ‘वर्क फ्रॉम होम’च्या जाळ्यात अडकवून तब्बल इतक्या लाखांची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल

ठाणे : ऑनलाईन गुंतवणूक आणि घरबसल्या कामाच्या आमिषातून फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून ठाणे शहरात असाच एक

ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीचा (शरदचंद्र पवार) स्वतंत्र गट

अश्रफ (शानू) पठाण गटनेते ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाने

भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील चावी फिरवणार

काँग्रेसच्या हातून महापौरपद थोडक्यात हुकणार? भिवंडी : भिवंडी–निजामपूर शहर महापालिकेच्या महापौरपदासाठी

पहिला महापौर करण्याची संधी मनसेने गमावली!

शिवसेनेऐवजी भाजपबरोबर गेले असते तर... राजकीय चर्चांना वेग कल्याण/ डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या

अडीच वर्षे महापौरपदाची ठाण्यात भाजपची मागणी

आ. निरंजन डावखरे आग्रही; शिवसेनेत तणाव ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप महायुतीने

Harbour AC local Update : हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल; 'या' तारखेपासून प्रवाशांना मिळणार ‘कूल’ प्रवासाचा अनुभव

नवी मुंबई : मुंबईकर लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वेने २६ जानेवारीपासून हार्बर